शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

...म्हणून जवान मोठ्या संख्येनं सोडताहेत हवाई दल; सर्वेक्षणातून चिंताजनक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 8:53 AM

हवाई दलाचं अंतर्गत सर्वेक्षण; जवानांनी सांगितली सेवा सोडण्यामागील कारणं

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलातील बरेचसे जवान सेवेतून बाहेर पडत असल्याचं वृत्त आहे. एका अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. काम करण्यास पोषक वातावरण नसल्यानं हवाई दलातले जवान त्यांच्या सेवेला पूर्णविराम देत असल्याचं सर्वेक्षण सांगतं. स्टेशन कमांडर, कमांडिंग अधिकारी यांच्यामध्ये या आशयाचं एक पत्र फिरत असल्याचं वृत्त 'द ट्रिब्यून'नं दिलं आहे.हवाई दलातील कर्मचारी सेवेमधून बाहेर पडू इच्छितात का, त्यामागची कारणं काय, याबद्दल दोन वर्ष सर्वेक्षण करण्यात आलं. त्यानंतर याबद्दलचं एक पत्र हवाई दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये फिरत आहे. काम करण्यासाठी उपयुक्त वातावरण मिळत नसल्यानं हवाई दलाचे ३२ टक्के जवान २० वर्षांनंतर सेवा सोडतात, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यामुळे हवाई दलाची चिंता वाढली आहे.हवाई दलातील सेवा सोडण्यामागे आणखीही काही महत्त्वाची कारणं आहेत. सामान्य नागरी जीवनात चांगले पर्याय मिळत असल्यानंदेखील अनेक जवान हवाई दलाला रामराम करतात. नागरी जीवनात चांगल्या संधी मिळत नसल्यानं हवाई दल सोडणाऱ्यांचं प्रमाण २५ टक्क्यांच्या घरात आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या संधीचा अभाव (१७ टक्के), कमी वेतन (७ टक्के) अशीदेखील कारणं जवानांना सांगितली आहेत.गेल्या पाच वर्षांत हवाई दलातल्या ४५ टक्के जवानांनी २० वर्षांच्या सेवेनंतर करारपत्रातील सेवा सोडण्याचा मार्ग निवडला. आपली सेवा कायम ठेवण्याचा पर्याय उपलब्ध असूनही जवानांनी सेवा सोडण्यास पसंती दिल्याची आकडेवारी हवाई दलानं दिली. 'प्रशिक्षित आणि अनुभवी मानवी संसाधनं गमावणं हवाई दलाच्या दृष्टीनं चिंताजनक आहे. हे रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलणं गरजेचं आहे. हवाई दलाचे जवान अशाच प्रकारे लवकर सेवेतून बाहेर पडू लागल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल,' असा मजकूर हवाई दलाच्या पत्रात आहे.पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?गिलगिट-बाल्टिस्‍तानवर भारताच्या 'मास्‍टरस्‍ट्रोक'ला सिक्कीममधील संघर्षातून चिनी उत्तर, तज्ज्ञांचा दावाड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल