शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:17 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर खोचक टीका केली होती, त्याला सिंहांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पाटणा: बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांच्यातील शाब्दिक युद्ध आणखी तीव्र झाले आहे. आराहमधील कार्यक्रमात आरसीपी सिंह यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 'नितीश कुमारांनी माझा दर्जा काढण्याऐवजी स्वतःकडे पाहावे. बिहारमध्ये जेव्हा त्यांचा काहीच दर्जा नव्हता, तेव्हाही आणि आजही मी त्यांच्यापेक्षा उच्च दर्जाचा आहे,' अशी टीका सिंह यांनी केली.

'ते नापास झाले अन् मी IAS'जनता दल युनायटेड (जेडीयू) चे माजी नेते आणि राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह पुढे म्हणाले की, 'जेव्हा नितीश कुमार काहीच नव्हते आणि तिकिटासाठी फिरायचे, तेव्हा मी 1982 मध्ये IAS झालो होतो, त्यांनी माझा दर्जा काय मोजावा. नितीश कुमार यांनी नौदलाची परीक्षा दिली होती, ते त्यात नापास झाले आणि मी IAS परीक्षेत संपूर्ण भारतात 13वा क्रमांक मिळवला होता.'

आरसीपी सिंह पुढे म्हणतात, 'लोकशाहीच्या या देशात सर्व नागरिक हा सन्मान आहेत. भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणाले की, माझ्यासाठी सर्व दरवाजे उघडे आहेत, सध्या मी कार्यकर्त्यांना भेटत आहे, पुढे काय होईल माहित नाही.' नितीश कुमार पंतप्रधान पदाचा चेहरा बनण्याच्या प्रश्नावर आरसीपी सिंह म्हणतात की, 'ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेते दावेदार आहेत. नितीश कुमार स्वत:ला मोठे नेते मानतात, ते इतरांना नेता मानतील की नाही, यात शंका आहे.'

नितीश कुमारांची खोचक टीकाकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आरसीपी सिंह यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता ते संतापले. सीएम नितीश कुमार म्हणाले होते की, 'कोणाचेही नाव घेऊ नका, त्यांचा दर्जा काय अन् माझा दर्जा काय. यापुढे माझ्यासमोर त्यांचे नाव घेऊ नका. ते एक आयएएस होते, त्यांना मी खाजगी सचिव बनवले आणि नंतर राजकारणात आणले. मला त्यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका.'

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा