शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:48 IST

आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदा भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर भारतीय रेल्वेकडून देशातील बहुतांश मार्गावरील आपली सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत भारतीय रेल्वेने मालवाहतुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करून त्यातून मोठा महसूल कमावल्याचे सांगितले जात आहे. यातच आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. (raosaheb danve assured to start two more special trains from mumbai to uttar pradesh and bihar)

विसरभोळेपणाचा कळस! ५० वर्षांनंतर परत केले लायब्ररीचे पुस्तक; दंड ऐकून बसेल धक्का

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी यासंदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी संजय पाण्डेय यांनी केली होती. हा विषय रावसाहेब दानवेंनी पूर्णपणे ऐकला. उत्तर भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी लवकरच आणखी दोन नवीन विशेष ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे संजय पाण्डेय म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात, मोदी सरकारची हीच भूमिका; संजय राऊतांचे टीकास्त्र

बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि MMR क्षेत्राच्या पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेऊन, वांद्रे टर्मिनस मुंबई ते वाराणसी, प्रयागराज आणि मुजफ्फरपूर, दरभंगा मार्गे वसई जंक्शन मार्गे २ नवीन ट्रेन सुरु करण्याबाबत प्रस्ताव मांडला. ज्यामुळे पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल आणि ट्रॅफिकचे देखील विकेंद्रीकरण होईल. वसई विरार येथे असलेल्या प्रवाशांना अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च करून कुर्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल, असे संजय पाण्डेय यांनी म्हटले आहे. 

Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे सरकारने अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यावर, राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे. राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा