शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
3
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
4
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
5
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
6
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
7
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
8
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
9
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
10
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
11
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
12
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
13
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
14
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
15
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
16
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
17
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
18
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?

“मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त, युपी आणि बिहारसाठी लवकरच आणखी २ स्पेशल ट्रेन”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 12:48 IST

आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली: कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदा भारतीय रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर भारतीय रेल्वेकडून देशातील बहुतांश मार्गावरील आपली सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येत आहे. कोरोना संकटाच्या कालावधीत भारतीय रेल्वेने मालवाहतुकीवर अधिक लक्ष केंद्रीत करून त्यातून मोठा महसूल कमावल्याचे सांगितले जात आहे. यातच आता मुंबईतून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी लवकरच आणखी दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. (raosaheb danve assured to start two more special trains from mumbai to uttar pradesh and bihar)

विसरभोळेपणाचा कळस! ५० वर्षांनंतर परत केले लायब्ररीचे पुस्तक; दंड ऐकून बसेल धक्का

भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी यासंदर्भात रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेशात पश्चिम भागात उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेन सुरु करण्याची मागणी संजय पाण्डेय यांनी केली होती. हा विषय रावसाहेब दानवेंनी पूर्णपणे ऐकला. उत्तर भारतीयांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी लवकरच आणखी दोन नवीन विशेष ट्रेन सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे संजय पाण्डेय म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात, मोदी सरकारची हीच भूमिका; संजय राऊतांचे टीकास्त्र

बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि MMR क्षेत्राच्या पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांची मोठी संख्या लक्षात घेऊन, वांद्रे टर्मिनस मुंबई ते वाराणसी, प्रयागराज आणि मुजफ्फरपूर, दरभंगा मार्गे वसई जंक्शन मार्गे २ नवीन ट्रेन सुरु करण्याबाबत प्रस्ताव मांडला. ज्यामुळे पश्चिम भागात राहणाऱ्या उत्तर भारतीयांना बिहार आणि उत्तर प्रदेशात येणे सोयीचे होईल आणि ट्रॅफिकचे देखील विकेंद्रीकरण होईल. वसई विरार येथे असलेल्या प्रवाशांना अनावश्यक वेळ आणि पैसा खर्च करून कुर्ला किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जावे लागणार नाही, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होईल, असे संजय पाण्डेय यांनी म्हटले आहे. 

Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, ठाकरे सरकारने अद्यापही मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. यावर, राज्य सरकारने आता राज्यातील निर्बंध शिथिल केल्याचा आधार घेत केंद्र सरकारला रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची विनंती केली तर आम्हाला काही अडचण नाही. राज्य आपली भूमिका जाहीर करत नाही तोवर केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. कारण शेवटी राज्य कोरोना स्थिती हाताळत आहे. राज्य सरकारने करोना स्थिती आटोक्यात आली आहे सांगत रेल्वे वाहतूक सुरु करण्याची विनंती केल्यास आम्ही परवानगी देऊ, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा