शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:20 PM

Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते.

काही महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लाखोंची गर्दी ओसंडली होती. मंदिर प्रशासनाला रात्रंदिवस मंदिर सुरु ठेवावे लागले होते. चेंगराचेंगरी होते की काय एवढी भीषण परिस्थिती होती. यामुळे यंदा रामनवमीला १५ लाखांच्यावर रामभक्त अयोध्येत दर्शनाला येतील असा अंदाज मंदिर प्रशासनाने लावला होता. परंतु, आजच्या दिवशी अयोध्येतील रस्ते ओस पडल्याचे चित्र होते. 

राम मंदिराचा प्रभाव आजबाजुच्या राज्यांत पडेल असा राजकीय होरा होता. यामुळेच मंदिराचे काम अर्धवट असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली होती. यावेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. तसेच ठिकठिकाणी रामभक्तांच्या गाड्या रोखाव्या लागल्या होत्या.

यानंतरची पहिलीच रामजन्मोत्सव असल्याने प्रशासनाने १५ लाख भक्त येणार असल्याचा दावा केला होता. परंतु याच्या उलट घडले आहे. अयोध्येच्या लोकांनी तर गेल्यावर्षीपेक्षा कमी गर्दी यंदाच्या रामनवमीला होती असे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. सकाळी ९ वाजल्यापासून गर्दी होणारा रामपथ सुनासुना होता. राम मंदिराच्या मुख्य गेटजवळ असलेल्या ११ नंबरच्या गेटवर देखील मंदिरात प्रवेश करणारे भक्त कमी होते. 

आलेल्या भक्तांसाठी सात दर्शन रांगांची सोय करण्यात आली होती. यापैकी पाच रांगा रिकाम्या होत्या. रामजन्मोत्सवाच्या दिवशी भक्तांची मोठी गर्दी होत असायची. परंतु यंदाचा रामजन्मोत्सव सुनासुनाच झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. आजच्या दिवशी चांगली विक्री होईल अशा आशेने दुकानदार होते, ते देखील निराश झाले होते असे व्यापारी विजय यादव यांनी सांगितले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Navamiराम नवमीRam Mandirराम मंदिर