शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:36 IST

विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाल्यास चांगले होईल असं विधान केलं होतं त्यानंतर या विधानावरुन विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

जर इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाचा उगम होणार नाही, दहशतवाद्यांना थारा देण्याचं काम पाकिस्तान करणार नाही. दहशतवादाचा मुळासकट उखडून काम पाकिस्तान करेल असं विधान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या जमिनीवर दहशतवादाला बळ देऊ नये. पाकिस्तान दहशतवादाचा प्रश्न सोडविण्यासाठी गंभीरतेने विचार करत असेल तर भारतदेखील पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दहशतवाद दहशतवादच असतो. त्याला जाती, धर्म आणि प्रांत असा काही नसतं. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर राष्ट्रांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काँग्रेसने आमच्या दहशतवादाच्या लढाईला कमकुवत केलं आहे. जवानांच्या धाडसावर, ध्येर्याचे कौतुक करणं गुन्हा आहे का? फक्त निवडणुकीच्या वेळी नाही तर आम्ही प्रत्येकवेळी जवानांच्या पराक्रमेचं कौतुक करतो. भाजपाने कधीच कोणाच्या देशभक्तीवर संशय घेतला नाही असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. महिनाभरापूर्वी परदेशी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतTerrorismदहशतवाद