शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:37 IST

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले.

- सुहास शेलारनिकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून येथील सर्वसामान्य जनता वेळोवेळी रस्त्यावर उतरली. मात्र, राजे सरकारने दडपशाहीच्या मार्गाने ही आंदोलने परतून लावली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये वसुंधरा राजे सरकारबद्दल नाराजी होती. त्याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.वसुंधरा राजे यांच्या संमतीशिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाइल पुढे सरकत नव्हती. राजेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. या एकछत्री कारभारामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली. साहजिकच याचा जाब सर्वसामान्य जनता सत्ताधारी आमदारांना विचारत होती. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी राजेंच्या एकछत्री कारभाराला कंटाळून बंडखोरी केली. यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली.२०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना अपयश आले. रोजगार, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्लीगल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. हे जनमनात होते, ते मतदानात परावर्तित झाले.दुसरीकडे, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सरदार सचिन पायलट यांनी गेल्या तीन-चार वर्षांत काँग्रेसच्या तद्दन कार्यपद्धतीत बदल करीत वसुंधरा राजे यांना वेळोवेळी घेरण्यास सुरुवात केली. शिवाय गावागावात फिरत कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला. युवकांना काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहण्यास भाग पाडले. राणीने मात्र पायलट यांच्या या रणनीतीला ‘बचपना’ असेच नाव दिले. काँग्रेसची रणनीती कमी लेखण्याची वृत्ती हेच राणीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. याखेरीज राज्यातील नेतृत्व मोठे ठरल्याने मोदींची खप्पामर्जी, अमित शहा यांना न जुमानण्याची वृत्तीही राजेंना भोवली, हे निकालातून दिसून आले.तीन कारणांमुळे झाला काँग्रेसचा विजयबेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून जनसामान्यांमध्ये भाजपाविषयी असलेली नाराजी.‘पद्मावत प्रकरणामुळे’ पारंपरिक मतदार राजपूतांनी भाजपाशी फारकत घेत काँग्रेसला दिलेले समर्थन.भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले. शिवाय पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा काढत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुस्लिमांची ओढवलेली नाराजी.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस