शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

राजस्थानी मतदारांनी केले राणीचे गर्वहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 06:37 IST

निकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले.

- सुहास शेलारनिकालाच्या आदल्या दिवसापर्यंत भाजपाच विजयी होईल आणि आपणच मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ, अशा गर्वात फिरणाऱ्या वसुंधरा राजे यांचे राजस्थानी मतदारांनी गर्वहरण केले. बेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून येथील सर्वसामान्य जनता वेळोवेळी रस्त्यावर उतरली. मात्र, राजे सरकारने दडपशाहीच्या मार्गाने ही आंदोलने परतून लावली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये वसुंधरा राजे सरकारबद्दल नाराजी होती. त्याचा थेट परिणाम मतदानावर दिसून आला.वसुंधरा राजे यांच्या संमतीशिवाय राजस्थानच्या मंत्रिमंडळातून एकही फाइल पुढे सरकत नव्हती. राजेंव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. या एकछत्री कारभारामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली. साहजिकच याचा जाब सर्वसामान्य जनता सत्ताधारी आमदारांना विचारत होती. त्यामुळे स्वपक्षीय आमदारच राजे यांच्या कारभारावर नाराज होते. त्यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी राजेंच्या एकछत्री कारभाराला कंटाळून बंडखोरी केली. यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने भाजपावर पराभवाची नामुष्की ओढवली.२०१३ च्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात वसुंधरा राजे यांना अपयश आले. रोजगार, शिक्षणाच्या आधुनिक सुविधा पुरवण्यात असमर्थ ठरल्यामुळे राजस्थानच्या गल्लीगल्लीत नवयुवक ‘मोदी तुझसे बैर नहीं, रानी तेरी खैर नहीं’ अशा घोषणा देत होते. हे जनमनात होते, ते मतदानात परावर्तित झाले.दुसरीकडे, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू सरदार सचिन पायलट यांनी गेल्या तीन-चार वर्षांत काँग्रेसच्या तद्दन कार्यपद्धतीत बदल करीत वसुंधरा राजे यांना वेळोवेळी घेरण्यास सुरुवात केली. शिवाय गावागावात फिरत कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकला. युवकांना काँग्रेसकडे सक्षम पर्याय म्हणून पाहण्यास भाग पाडले. राणीने मात्र पायलट यांच्या या रणनीतीला ‘बचपना’ असेच नाव दिले. काँग्रेसची रणनीती कमी लेखण्याची वृत्ती हेच राणीच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. याखेरीज राज्यातील नेतृत्व मोठे ठरल्याने मोदींची खप्पामर्जी, अमित शहा यांना न जुमानण्याची वृत्तीही राजेंना भोवली, हे निकालातून दिसून आले.तीन कारणांमुळे झाला काँग्रेसचा विजयबेरोजगारी, आरक्षण, कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवरून जनसामान्यांमध्ये भाजपाविषयी असलेली नाराजी.‘पद्मावत प्रकरणामुळे’ पारंपरिक मतदार राजपूतांनी भाजपाशी फारकत घेत काँग्रेसला दिलेले समर्थन.भाजपाने केवळ एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले. शिवाय पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा काढत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने मुस्लिमांची ओढवलेली नाराजी.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस