शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

कर्तव्यनिष्ठेला सलाम! विद्यार्थ्यांसाठी उंटावरून प्रवास करताहेत शिक्षक; घरोघरी जाऊन देताहेत शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 11:11 IST

Teachers Go To Students Homes On Camels For Classes : स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही तीन कोटींवर पोहोचली आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊन नये यासाठी शाळा -महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन क्लासेसवर अधिक भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच गरीब विद्यार्थ्यांसाठी काही जण पुढाकार घेत आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. 

राजस्थानच्या बारमेरमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चक्क उंटावरून प्रवास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक उंटावर बसून शिकवायला जातात. वाळवंटातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिक्षकांनी उंटांची मदत घेतली आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जात आहे. राजस्थान शिक्षण विभागाचे अधिकारी सौरव स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 75 लाख विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांकडे मोबाईल नाही आहे. 

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनवेळा घरी जाऊन शिकवावे असे ठरले. "आपण सध्या कठीण काळातून जात आहोत. मात्र या काळात आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना देखील कमीत कमी अडचणी याव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत" अशी माहिती सौरव स्वामी यांनी दिली आहे. सर्वत्र या शिक्षकांचं कौतुक केलं जात आहे. भीमथल या सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रुप सिंह झाकड यांनी देखील शिक्षकांचे कौतुक केले आहे.

"हे शिक्षक नक्कीच कौतुकास पात्र आहेत. असे प्रयोग सातत्याने होत राहायला पाहिजेत. बारमेरमध्ये विद्यार्थ्यांकडे संसाधनांची कमी आहे. पण राज्य सरकारच्या निर्देशानंतर आम्ही गावकऱ्यांसोबत राहून अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहोत" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच हे काम दिसतं तितकं सोपंही नाही. दूरवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये देखील प्रत्येक ठिकाणी अडचणी येत असतात. सुरुवातीला शिक्षकांना काही अडचणी आल्या पण त्यांनी यावर मात केल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणRajasthanराजस्थानStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षकIndiaभारत