शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:05 IST

राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहेआमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनी केले

अलवर - राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनीही अलवरमधील रैणी भागात असेच एक वक्तव्य केले असून, त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे ममता भूपेश यांनी म्हटले आहे. सोमवारी रैणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ममता भूपेश म्हणाल्या की, ''आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी आहे. त्यानंतर समाजासाठी, त्यानंतर सर्व समाजासाठी. सर्वांसाठी. सर्वांसाठी काम करता यावे हीच आमची इच्छा आहे." 

दरम्यान ममता भूपेश यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच ममता भूपेश यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती सन्मानाने राहावी, त्याबरोबरच सर्वांसाठी काम व्हावे, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसPoliticsराजकारण