शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

आधी आपल्या जातीचे, नंतर बाकीचे; राजस्थानमधील काँग्रेसच्या महिला मंत्र्याची मुक्ताफळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 12:05 IST

राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहेआमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे वक्तव्य राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनी केले

अलवर - राजस्थानमध्ये झालेल्या  वसुंधरा राजे सरकारला पायउतार करत काँग्रेसने दणदणीत  विजय मिळवला होता. त्यानंतर राज्यात अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन होऊन काही दिवस लोटत नाहीत तोच मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला बालकल्याण राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार ममता भूपेश यांनीही अलवरमधील रैणी भागात असेच एक वक्तव्य केले असून, त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आमच्यासाठी जात प्रथम, नंतर समाज आणि त्यानंतर सर्व, असे ममता भूपेश यांनी म्हटले आहे. सोमवारी रैणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना ममता भूपेश म्हणाल्या की, ''आमचे प्रथम कर्तव्य हे आमच्या जातीसाठी आहे. त्यानंतर समाजासाठी, त्यानंतर सर्व समाजासाठी. सर्वांसाठी. सर्वांसाठी काम करता यावे हीच आमची इच्छा आहे." 

दरम्यान ममता भूपेश यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता लक्षात येताच ममता भूपेश यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. राज्यात राहणारी प्रत्येक व्यक्ती सन्मानाने राहावी, त्याबरोबरच सर्वांसाठी काम व्हावे, असे आम्हाला वाटते, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcongressकाँग्रेसPoliticsराजकारण