शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

'त्या' एका निर्णयानं राजस्थानात डबल धमाका; भाजपा, बसपाला जबर धक्का, काँग्रेसला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 15:40 IST

भाजपा आमदाराची याचिका उच्च न्यायालयाकडून रद्द; काँग्रेसला दिलासा

जयपूर- राजस्थानमध्येकाँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेली याचिका राजस्थान उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्वच्या सर्व ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षांतराविरोधात दिलावर यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका आज न्यायालयानं फेटाळून लावली.राजस्थानातल्या बसपाच्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली.बसपाची मागणीदेखील रद्दभाजपा आमदार मदन दिलावर यांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्यालाही पक्षकार करून घेण्यात यावं अशी मागणी बसपाकडून करण्यात आली होती. त्यावर दिलावर यांचीच याचिका रद्द केली असताना बसपाला पक्षकार करण्याचा प्रश्नच येत नाही, असं न्यायालयानं म्हटलं.काय आहे प्रकरण?बसपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या लखन सिंह (करोली), राजेंद्र सिंह गुढा (उदयपुरवाटी), दीपचंद खेडिया (किशनगढ बास), जोगेंदर सिंह अवाना (नदबई), संदीप कुमार (तिजारा) आणि वाजिब अली (नगर, भरतपूर) या सहा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपा आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे तक्रार केली. पक्षांतरबंदी कायद्यानुसार सर्व सदस्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी दिलावर यांनी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर न्यायालयात गेले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा