शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीनं रेल्वेचं एक पाऊल पुढे; पाच वर्षांमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 4:42 PM

गेल्या वर्षभरात अपघात आणि अपघाती मृत्यूंच्या प्रमाणात लक्षणीय घट

नवी दिल्ली: असुरक्षित प्रवासामुळे कायम रडारवर असणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वर्षभरात चांगली सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2018 या वर्षभराच्या कालावधीत 75 रेल्वेअपघातांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 वर्षांमधील रेल्वे दुर्घटना आणि त्यातील बळींची संख्या लक्षात घेतल्यास, गेल्या वर्षभरात सुरक्षेच्या बाबतीत रेल्वेची कामगिरी सुधारली आहे. रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सरकारी आकड्यांचा आधार घेऊन ही माहिती दिली. सप्टेंबर 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत आठ अपघातांमध्ये 249 लोकांचा मृत्यू झाला होता. यातील इंदूर-पाटणा एक्स्प्रेसला झालेला अपघात सर्वात भीषण होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानं झालेल्या अपघातात 150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. मात्र गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या 40 वर आली आहे. या काळात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. ऑगस्ट 2017 मध्ये उत्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातात 20 लोकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशात एका शाळेच्या बसला रेल्वेनं धडक दिल्यानं 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर 2013 ते ऑगस्ट 2014 या कालावधीत 139 रेल्वे अपघात झाले होते. त्यात 275 लोकांचा मृत्यू झाला होता. 2014 ते 2015 या कालावधीत 108 अपघातांमध्ये 196 जणांनी जीव गमावला होता. '1 सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2014 या कालावधीतील आकड्यांची तुलना 1 सप्टेंबर 2017 ते  31 ऑगस्ट 2018 या कालावधीतील अपघातांच्या आकडेवारीशी केल्यास दुर्घटनांची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रेल्वे गाड्यांची धडक आणि रेल्वे गाड्या रुळांवरुन घसरण्याच्या घटनांचं प्रमाण 62 वरुन 4 वर आलं आहे,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात