शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:13 IST

राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी असलेले अनेक वर्षांचे संबंध तोडून वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्या गुलाम नबी आझादांनी आता राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवत मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित करत, ट्विटच्या माध्यमाने अदानीच्या कंपनीत बेनामी 20 हजार कोटी रुपये कुणाचे, असा प्रश्न केला होता. यात त्यांनी काँग्रेस सोडलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. ज्यात गुलाम नबी आझाद यांचेही नाव होते. राहुल यांच्या याच आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे.

राहुल यांच्या आरोपानंतर, गुलाम नबी आझाद यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी यांचेच अवांछित उद्योगपतींशी संबंध आहेत, ते आणि गांधी कुटुंब त्यांना भेटण्यासाठी परदेशातही जातात. आझाद यांच्या या दाव्यानंतर अथवा आरोपानंतर आता भारतीय जनता पक्षानेही राहुल गांधींना घेरले आहे. तसेच, राहुल गांधी ज्या उद्योगपतींना भेटले, त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर, एका टीव्ही चॅनलसोबत बोलतांना आझाद म्हणाले, "राहुल गांधी यांचेही अवांछित उद्योगपतींसोबत (Undesirable Businessman) संबंध आहेत. एवढेचनही तर, राहुल यांच्यासह संपूर्ण गांधी कुटुंबीयांचेच अशा उद्योगपतींशी संबंध आहेत. मी याची 10 उदाहरणे देऊ शकतो, की जेथे परदेशात जाऊनही ते या उद्योगपतींनी भेटतात." जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आझाद यांचे गांधी कुटुंबासोबत तब्बल 50 वर्षांचे नाते होते. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी 'डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी'ची स्थापना केली.

काय होतं राहुल यांचं ट्विट? -राहुल गंधी यांनी गेल्या 8 एप्रिलला एका ट्विट करत, "सत्य लपवतात, म्हणूनच रोज भटकवतात!", प्रश्न तोच आहे - अदानीच्या कंपन्यांमध्ये ₹20,000 कोटी बेनामी पैसा कुणाचा? असा सवाल केला होता. तसेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझादांसह काही भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही अदानी वादात ओढले होते. 

आझाद यांच्या आरोपानंतर भाजपनेही राहुल यांना निशाण्यावर घेतले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांना सवाल केला आहे की, हे कोणते उद्योगपती आहेत ज्यांना आपण (राहुल गांधी) भेटता आणि आपली काय 'विलिंग-डीलिंग' आहे? हे जाणण्याची भाजपची इच्छा आहे. गुलाम नबी आझाद यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे की, राहुल गांधी जेव्हा-जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा-तेव्हा ते अनेक 'अवांछित उद्योगपतींना' भेटतात आणि अनेक उद्योगपती घराण्यांशी त्यांचे संबंध आहेत. 

त्यामुळे, आता देशाला जाणून घ्यायचे आहे की, राहुल गांधी परदेश दौऱ्यात कुणाला भेटतात? कोण आहेत हे 'अवांछित व्यापारी'? त्यांचे हितसंबंध काय आहेत? राहुल गांधी भारत विरोधी व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर तर भारताला कमकुवत करण्यासाठी आणि मोदींच्या विरोधात काम करत नाहीत ना? असा सवालही रवीशंकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा