शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधींचे उद्योगपतींशी संबंध, भेटण्यासाठी परदेशात जातात'! गुलाम नबींच्या दाव्यानं राजकीय भूकंप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 16:13 IST

राहुल यांच्या आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस आणि गांधी कुटुंबाशी असलेले अनेक वर्षांचे संबंध तोडून वेगळा पक्ष स्थापन करणाऱ्या गुलाम नबी आझादांनी आता राहुल गांधींवर जबरदस्त हल्ला चढवत मोठा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंधांवर प्रश्न उपस्थित करत, ट्विटच्या माध्यमाने अदानीच्या कंपनीत बेनामी 20 हजार कोटी रुपये कुणाचे, असा प्रश्न केला होता. यात त्यांनी काँग्रेस सोडलेल्या नेत्यांचा उल्लेख केला. ज्यात गुलाम नबी आझाद यांचेही नाव होते. राहुल यांच्या याच आरोपानंतर, आता गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या (राहुल गांधी) संदर्भात मोठा दावा केला आहे.

राहुल यांच्या आरोपानंतर, गुलाम नबी आझाद यांनी दावा केला आहे की, राहुल गांधी यांचेच अवांछित उद्योगपतींशी संबंध आहेत, ते आणि गांधी कुटुंब त्यांना भेटण्यासाठी परदेशातही जातात. आझाद यांच्या या दाव्यानंतर अथवा आरोपानंतर आता भारतीय जनता पक्षानेही राहुल गांधींना घेरले आहे. तसेच, राहुल गांधी ज्या उद्योगपतींना भेटले, त्यांची नावे त्यांनी जाहीर करावीत, असे भाजपने म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर, एका टीव्ही चॅनलसोबत बोलतांना आझाद म्हणाले, "राहुल गांधी यांचेही अवांछित उद्योगपतींसोबत (Undesirable Businessman) संबंध आहेत. एवढेचनही तर, राहुल यांच्यासह संपूर्ण गांधी कुटुंबीयांचेच अशा उद्योगपतींशी संबंध आहेत. मी याची 10 उदाहरणे देऊ शकतो, की जेथे परदेशात जाऊनही ते या उद्योगपतींनी भेटतात." जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री आझाद यांचे गांधी कुटुंबासोबत तब्बल 50 वर्षांचे नाते होते. मात्र काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी 'डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी'ची स्थापना केली.

काय होतं राहुल यांचं ट्विट? -राहुल गंधी यांनी गेल्या 8 एप्रिलला एका ट्विट करत, "सत्य लपवतात, म्हणूनच रोज भटकवतात!", प्रश्न तोच आहे - अदानीच्या कंपन्यांमध्ये ₹20,000 कोटी बेनामी पैसा कुणाचा? असा सवाल केला होता. तसेच काँग्रेस सोडलेल्या गुलाम नबी आझादांसह काही भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनाही अदानी वादात ओढले होते. 

आझाद यांच्या आरोपानंतर भाजपनेही राहुल यांना निशाण्यावर घेतले आहे. यासंदर्भात बोलताना भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांना सवाल केला आहे की, हे कोणते उद्योगपती आहेत ज्यांना आपण (राहुल गांधी) भेटता आणि आपली काय 'विलिंग-डीलिंग' आहे? हे जाणण्याची भाजपची इच्छा आहे. गुलाम नबी आझाद यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे की, राहुल गांधी जेव्हा-जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा-तेव्हा ते अनेक 'अवांछित उद्योगपतींना' भेटतात आणि अनेक उद्योगपती घराण्यांशी त्यांचे संबंध आहेत. 

त्यामुळे, आता देशाला जाणून घ्यायचे आहे की, राहुल गांधी परदेश दौऱ्यात कुणाला भेटतात? कोण आहेत हे 'अवांछित व्यापारी'? त्यांचे हितसंबंध काय आहेत? राहुल गांधी भारत विरोधी व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावर तर भारताला कमकुवत करण्यासाठी आणि मोदींच्या विरोधात काम करत नाहीत ना? असा सवालही रवीशंकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा