शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपुरचा वापर ATM प्रमाणे केला, पण मोदींनी...; स्मृती इराणींची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 09:25 IST

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का?, स्मृती इराणी यांचा सवाल.

Smriti Irani on Congress Rahul Gandhi : सध्या मणिपूरमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) प्रचारासाठी मणिपूर येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसंच मणिपूरचा वापर राहुल गांधींच्या यांनी एटीएमप्रमाणे केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

"राहुल गांधींच्या कुटुंबानं मणिपूरचा वापर एटीएमप्रमाणे केला. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेची सुरूवात केली. ११ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर आम्ही मणिपूरच्या शेतकऱ्या अतिरिक्त २ हजार रुपये देऊ," अशी घोषणा स्मृती इराणी यांनी केली.

जो पक्ष राज्यात शौचालय तयार करू शकला नाही, तो पक्ष भविष्यात राज्याचा विकास करेल असं तुम्हाला वाटतं का? असा सवालही त्यांनी केला. पूर्वेकडिल क्षेत्राकडे दुर्लक्ष आण आपलाच खिसा भरण्यासाठी एटीएमप्रमाणे वापर केल्याचा आरोप करत मणिपूरचे भाजप प्रभारी संबित पात्रा (Sambit Patra) आणि स्मृती इराणी यांनी २१ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींच्या निर्धारित रॅलीवर लोकांना बहिष्कार टाकण्यास सांगितलं. 

"काँग्रेस विकास करेल का?"मणिपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या इराणी यांनी शुक्रवारी इम्फाळ पूर्वेतील वांगखेई भागात पारंपारिक काबुई नृत्य करणाऱ्या कलाकारांसोबत नृत्यही केले. सध्या सोशल मीडियावर (Social Media) याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्मृती इराणी भाजपचे उमेदवार ओकराम हेनरी सिंग यांच्या प्रचारासाठी दाखल झाल्या होत्या. ओकराम हेनरी हे मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांचे पुतणे असून ते वांगखेई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. "काँग्रेस पक्षाला शौचालय बांधता आले नाही. ते भविष्यात तुमच्यासाठी काम करेल आणि विकास करेल अशी तुम्हाला आशा आहे का?," असा सवालही इराणी यांनी केला.  "भाजप राज्यात समृद्धी आणेल""केवळ भाजपच राज्यात समृद्धी आणेल. भाजप २८ फेब्रुवारीनंतर मणिपूरमध्ये पहिलं एम्स आणेल. मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही त्यांना लॅपटॉप आणि स्कुटी देऊ. गांधी कुटुंबानं मणिपूरमध्ये स्वार्थासाठी राजकारण केलं. इथल्या लोकांना नाकाबंदीचा सामना करावा लागला. या ठिकाणी भविष्य दिसत नसल्यानं लोकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या शहरांमध्ये पाठवावं लागत होतं," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

काँग्रेस सरकारनं मणिपूरसोबत अन्याय केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक घरात शौचालय उभारलंय. राजकारणात शौचालय कधीच अजेंड्याचा विषय नव्हता. परंतु मोदींनी असं केलं असल्याचंही त्या म्हणाल्या. यावेळी संबित पात्रा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही निशाणा साधला. डॉ. मनमोहन सिंग हे आसाममधून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून गेले होते. परंतु आपल्या कार्यकाळादरम्यान ते कधीही मणिपूरला गेले नाही, असं पात्रा म्हणाले.

टॅग्स :Manipur Assembly Election 2022मणिपूर विधानसभा निवडणूक २०२२Smriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीSambit Patraसंबित पात्रा