शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

भाषणातून हटवलेले शब्द पाहून राहुल गांधी संतापले; सभापतींना पत्र लिहून सांगितले नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 14:26 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या कामकाजाच्या सहाव्या दिवशी (1 जुलै) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून पहिले भाषण केले. यावेळी राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरण, अग्निवीर योजना आणि मणिपूर मुद्द्यावर केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग हटवण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातील टिप्पणी कामकाजात पूर्ववत ठेवावीत, अशी विनंती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्राद्वारे केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले, "माझ्या भाषणातील बराचसा भाग कामकाजातून काढून टाकण्यात आल्याने मला धक्का बसला आहे. हे संसदेच्या नियमांच्या विरोधात आहे." 

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांचे भाषणही आरोपांनी भरलेले होते, मात्र त्यांच्या भाषणातून एकच शब्द काढण्यात आला. याबाबत केलेला भेदभाव समजण्यापलीकडचा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच, सभागृहात सत्य मांडले. संसदेत जनतेशी संबंधित प्रश्न मांडण्याचा अधिकार प्रत्येक खासदाराला आहे. हेच लक्षात घेऊन मी माझे भाषण दिले. नरेंद्र मोदींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, परंतु वास्तवात नाही, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी पत्र लिहिल्यामुळे भाजपने पलटवार केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणातील हिंदू आणि इतर काही धर्मांबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. तसेच, नरेंद्र मोदी, आएसएस, भाजपवरचा भाग नोंदीतून काढून टाकण्यात आल्याची माहिती आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसParliamentसंसदom birlaओम बिर्लाBJPभाजपा