शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

मोदी सरकारच्या कारकीर्दीत बेरोजगारी प्रचंड वाढली; राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 7:34 AM

उद्योगांवरही आले संकट

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कारकीर्दीत नोकऱ्याच उपलब्ध होत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, बेरोजगारी इतकी वाढली आहे की, आठवड्याची सुटी व कामाचे दिवस यांच्यातला पूर्वी जो फरक होता तोच संपत चाललेला आहे. हाताला काम नाही अशी अनेकांची स्थिती आहे. भारतात करत असलेली वाहननिर्मिती थांबविण्याचा निर्णय फोर्ड या अमेरिकी कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ४ हजार लघुउद्योगही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, काम नसलेला दिवस कोणता व सुट्टीचा दिवस कोणता यातला फरक ओळखता येणार नाही अशी स्थिती मोदी सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

पोकळ दावे

आमच्या कारकीर्दीत देशात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली, रोजगारीचे प्रमाणही वाढत आहे असे पोकळ दावे मोदी सरकारकडून केले जातात. मात्र कोरोना साथीच्या काळात बसलेल्या फटक्यातून लहानमोठे उद्योगधंदे अद्याप पुरेसे सावरलेले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी याआधीही केली होती. 

टॅग्स :PoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUnemploymentबेरोजगारीCentral Governmentकेंद्र सरकार