शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

जिवंत असो वा मृत त्यांना खाणीतून लवकर बाहेर काढा; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र व राज्याला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 3:17 AM

मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले.

नवी दिल्ली : मेघालयातील कोळसा खाणीत गेल्या बावीस दिवसांपासून अडकलेल्या पंधरा जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेल्या मदतकार्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी असमाधान व्यक्त केले. अडकलेले सर्व मग ते जिवंत असो वा मृत त्यांना लवकर खाणीतून बाहेर काढा, असा आदेश न्यायालयाने सरकारला दिला आहे.न्यायालयाने म्हटले की, खाणीत अडकलेले सर्व लोक जिवंत असू देत हीच सदिच्छा व्यक्त करतो. त्यांच्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. या मदतकार्यासाठी लष्कराची मदत का घेण्यात आली नाही, असाही सवाल न्यायालयाने सरकारला केला. लष्कराला पाचारण करायचे की नाही हा निर्णय गेले काही दिवस लालफितीच्या कारभारात अडकला होता.या बचावकार्याला गती येण्यासाठी न्यायालय काही हंगामी आदेश देण्याची शक्यता आहे. मेघालयमधील पूर्व जैंतिया जिल्ह्यामधील खाणीत अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत याकरिता एक याचिका दाखल झाली आहे. अडकलेल्या लोकांची मुक्तता करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, नौदल, कोल इंडिया यांच्या सहकार्याने १४ डिसेंबरपासून मदतकार्य सुरू केल्याचे मेघालय सरकारने याआधीच न्यायालयाला सांगितले होते. मात्र, हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.मदतकार्यात अडचणीमेघालयमध्ये कोळसा खाणींमध्ये चोरटे बोगदे खणले जातात. अशा कामांत बालमजुरांचा वापर केला जातो. क्सान येथील खाणीत अशाच प्रकारे बोगदा खणला जात असताना जवळच्याच नदीचे पाणी त्यात घुसून सर्व खाणकामगार आत अडकले.उच्चशक्तीचे विजेचे पंप तसेच आणखी आवश्यक साधनसामग्री नसल्याने मदतकार्य थंडावले होते. मात्र, हवाई दलाच्या विमानातून ही साधनसामग्री नजीकच्या ठिकाणापर्यंतची व्यवस्था झाल्याने मदतकार्यास वेग आला.खाणीत अडकलेले आपले सगेसोयरे जिवंत असतील ही आशा त्यांच्या नातेवाईकांनी सोडून दिली आहे. अडकलेल्यांचे मृतदेह जरी बाहेर काढले तरी ते पुरेसे आहे, असे या नातेवाईकांपैकी एकाने सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालय