नवीन महापालिकेचा प्रस्ताव एक महिना पुढे
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30
पुणे : महापालिकेच्या हददीजवळील तब्बल 38 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रीया राज्यशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार असून या गावांच्या विकासासाठी 25 हजार कोटी रूपयांची आवश्यकता आहे. त्यातच महापालिकेस अंदाजपत्रकास आर्थिक तूट असल्याने या बाबींचा विचार करून राज्यशासनाने नव्याने समाविष्ट होणा-या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी याबाबत शासनास विनंती करणारा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत एक महिना पुढे ढकलण्यात आला. कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे आणि मुकारी अलगुडे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता.

नवीन महापालिकेचा प्रस्ताव एक महिना पुढे
प णे : महापालिकेच्या हददीजवळील तब्बल 38 गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रीया राज्यशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत सुविधांवर ताण येणार असून या गावांच्या विकासासाठी 25 हजार कोटी रूपयांची आवश्यकता आहे. त्यातच महापालिकेस अंदाजपत्रकास आर्थिक तूट असल्याने या बाबींचा विचार करून राज्यशासनाने नव्याने समाविष्ट होणा-या गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करावी याबाबत शासनास विनंती करणारा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत एक महिना पुढे ढकलण्यात आला. कॉंग्रेसचे नगरसेवक संजय बालगुडे आणि मुकारी अलगुडे यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. राज्यशासनाकडून मागील वर्षी हददीजवळील 34 गावे पालिकेत घेण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेनेही त्यास अनुममती दर्शविली होती. त्यावर हरकती आणि सूचनांची प्रक्रीयाही पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी ही गावे महापालिकेत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शासनाने आणखी 4 गावे पालिकेत घेण्याबाबत विचारणा केली होती. पालिकेने जादा पाणी तसेच या गावांच्या विकासासाठी अनुदान देण्याच्या अटीवर ही जादा गावे घेण्यासही सहमती दर्शविली आहे. ही गावे महापालिकेत आल्याने त्यांचा सर्वसमावेशक विकास होणे आवश्यक आहे. मात्र, ही गावे पालिकेत आल्यास पालिकेची भौगोलिक वाढ मोठया प्रमाणात होणार असून सोयी सुविधा महापालिकेस पुरविणे शक्य होणार नाही. तसेच प्रशासकीय कारभारावर नियंत्रण ठेवणेही अवघड होणार आहे. त्यामुळे महापालिकेवर मोठा आर्थिक बोजा येणार असून त्यासाठी जवळपास 25 हजार कोटींच्या खर्चाची आवश्यकता भासणार आहे. त्यातच गेल्या काही वर्षात महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी जवळपास हजार कोटींची तूट येत असल्याने हा आर्थिक भार महापालिकेस पेलावणारा नाही. त्यामुळे नव्याने समाविष्ट होणा-या गावांची स्वतंत्र महापालिका करावी अशी विनंती राज्यशासनास करावी असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादी वगळता इतर पक्षाच्या सदस्यांनी त्याबाबत अक्षेप घेतल्याने तो एक महिना पुढे ढकलण्यात आला.===========================