शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

"पंतप्रधान मोदी बोलताहेत चीनची भाषा" गंभीर आरोप करत काँग्रेसने डागले पाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 9:00 PM

लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले होतेअनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यात भारताच्या भूभागावर झालेली चिनी घुसखोरी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही तापले आहे. लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे. 

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले. हीच भाषा चीनही बोलत आहे आम्ही भारताच्या कुठल्याही भागात घुसखोरी केली नसल्याचे सांगत आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

अनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान, देशाच्या भूमीचे रक्षण करताना कर्नल संतोष बाबूंसह २० जवान धारातीर्थी पडले. तर ८५ जण जखमी झाले. याशिवाय १० जवानांना चीनने पकडले होते. आता मोदी सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. 

यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाच सवालही डागले. ते पुढीलप्रमाणे

१) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य म्हणजे गलवान खोऱ्यातून चीनला हाकलवण्यासाठी गेलेल्या कर्नल संतोष बाबू आणि अन्य १९ जवानांच्या वीरतेचा आणि बलिदानाचा अवमान नव्हे काय?

२) चीनने गलवान खोऱ्यावर कधी दावा केला नव्हता? चीन आता गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे? 

३) संरक्षण तज्ज्ञ, लष्करी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंच्या माध्यमातून चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मग सरकार ही बाब का नाकारत आहे. 

४) सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आमच्या भूभागावर कुणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र नंतर पीएमओने आपल्या अधिकृत वक्तव्यातून हे विधान का हटवले. जर आमच्या क्षेत्रात कुणी घुसखोरी केली नसेल तर आमचे २० जवान कसे शहीद झाले? 

५) गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या बांधकामाबाबत संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेले दावे पंतप्रधान मोदी का खोडून काढत आहेत? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसPoliticsराजकारण