शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

जळगाव अपघाताची पंतप्रधानांकडूनही दखल, मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 4:25 PM

PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident : जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

ठळक मुद्देजळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

जळगाव - तालुक्यातील अभोडा, केर्‍हाळे, विवरे, रावेर येथील हातावर पोट असलेले मजूर बायका पोरांसह धुळे जिल्ह्यातील शहादा तालूक्यात पपई भरून आणण्याच्या हातमजुरीसाठी नेहमीप्रमाणे जात असताना भीषण अपघात झाला. या अपघातात एक दाम्पत्य, तीन कुटूंबातील मायलेकी व मायलेकांसह ११ जण अभोडा येथील, दोन रावेर तर केर्‍हाळे व विवरे येथील एकेक जण असे एकूण १५ जण पपईने भरलेला ट्रक किनगावनजीक पलटल्याने आज पहाटे जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सर्वत्र हाहाकार उडवणाऱ्या या घटनेने अभोडा, विवरे, केर्‍हाळे व रावेर शहरासह तालूक्यात एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  Uddhav Thackeray या घटनेची दखल घेत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना मदत जाहीर केलीय.  ( PM Modi Condoles Loss Of Lives In Jalgaon Road Accident )

जळगावमधील मजुरांच्या अपघाताची घटना वेदनादायक असून पीडित कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो, आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi म्हटलंय. तसेच, या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत, पंतप्रधान सहायता निधीमधून जाहीर करण्यात आली आहे. तर, गंभीर जखमींना 50 हजारांची मदतही देण्याचं पीएमओ कार्यालयाने सांगितलंय. 

मुख्यमंत्र्यांकडूनही मदत जाहीर 

मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करुन मृतांच्या वारसांना सरकारकडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींवरील उपचाराचा खर्चही शासन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली असून संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शहादा येथे  पपई भरून आणण्याच्या हातमजूरीसाठी गेलेल्या तालुक्यातील हे मजूर रविवारी ट्रकमध्ये पपई भरून रावेरला आणत असताना क्रूर नियतीने झडप घालून यावल तालुक्यातील किनगावजवळ बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राज्य महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने अभोडा येथील एकाच आप्तपरिवारातील ११ जणांवर झडप घातल्याने अभोडा गावावर शोककळा पसरली.

मृतांची नावे

मृतांमध्ये अशोक जगन वाघ (वय ४०), संगिता अशोक वाघ (वय २५) या दाम्पत्यासह त्यांची  लहानगा मुलगा सागर अशोक वाघ (वय ०३ वर्षे)व  नरेंद्र वामन वाघ (वय २५) हे एकाच परिवारातील चार सदस्य कमलाबाई रमेश मोरे (वय ४५) यांची शारदा रमेश मोरे (वय १५) व गणेश रमेश मोरे (वय ०५) वर्षे ही दोन्ही मुल मुली , संदीप युवराज भालेराव (वय २५) व दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) हे दाम्पत्य, सबनूर हूसेन तडवी (वय ५३) व दिलदार हुसेन तडवी (वय २०) हे मायलेकांसह  रावेर येथील शेख हुसेन शेख मण्यार फकीरवाडा रावेर, डिगंबर माधव सपकाळे वय ५५ रावेर, केर्‍हाळे येथील सर्फराज कासम तडवी वय ३२ व संदीप युवराज भालेराव विवरे अशी १५ जण जागीच ठार झाल्याने एकच शोककळा पसरली असून, अभोडावासीयांची साखरझोपेतील झोप उडाली असून मुखशुद्धीसह चहापाणीसाठी आज पहाटे गावात एकही चूल पेटली नाही.

उपमुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केला शोक

जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील किनगाव हद्दीत पपई घेऊन जाणाऱा टेम्पो उलटून पंधरा मजूरांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटेनेतील मृत बांधवांना श्रद्धांजली वाहिली. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली असून अपघातातील जखमींची प्रकृती लवकर सुधारावी, अशी प्रार्थनाही त्यांनी केली. अपघातस्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पोलिस, मदत पथकाचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावNarendra Modiनरेंद्र मोदीAccidentअपघात