शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींनी टोचले गोंधळबाजांचे कान

By admin | Updated: January 20, 2015 02:41 IST

काँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीकाँग्रेससाठी सोमवार दुहेरी अडचणींचा ठरला. संसदेत गोंधळ घालत कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जाहीररीत्या फटकारले. दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री कृष्णा तीरथ यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत काँग्रेसला हादरा दिला आहे.आर्थिक सुधारणांचा रेटा दाखवणाऱ्या विविध विधेयकांच्या संमतीसाठी गत आठ महिन्यांत आठ वटहुकूम काढणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सोमवारी अप्रत्यक्षरीत्या ताकीद दिली़ प्रत्येक विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाचा पर्याय स्वीकारणे योग्य नसल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले़केंद्रीय विद्यापीठे आणि संशोधन संस्थांचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले़ या वेळी वटहुकुमाच्या मुद्द्यावर केवळ सरकारच नाही, तर विरोधकांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या़ संसदेतील गोंधळ आणि वटहुुकुमाबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राष्ट्रपती म्हणाले की, राज्यघटनेनुसार विधेयकाच्या संमतीसाठी वटहुकुमाच्या पर्यायाचावापर अत्यंत अपवादात्मक स्थितीत होणे अपेक्षित आहे़ सरसकट सर्वच विधेयकासाठी वटहुकूम आणणे योग्य नाही़कार्यपालिकेद्वारे सर्रास वटहुकूम जारी करण्यासंदर्भात विचारले असता, मी राजकीय पक्षांशी बोललो आहे़ एकत्र येऊन सामंजस्याने तोडगा काढावा, असे मी त्यांना सुचवले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले़अल्पसंख्यक असलेल्या गोंधळकऱ्यांकडून संयमी बहुसंख्यक घेरले जाऊ नये, असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले.संसदेत वारंवार अडथळे आणत कामकाज रोखण्याच्या वृत्तींवर राष्ट्रपतींनी केलेली टीका काँग्रेसला जास्त बोचणारी आहे. राष्ट्रपती एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तीन दशकांनंतर देशातील मतदारांनी एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत स्थिर सरकारसाठी आणि जनतेच्या आशाआकांक्षाच्या पूर्ततेसाठी कौल दिला असल्याचे नमूद केले. राज्यसभेत काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी कामकाजाचा खोळंबा चालविल्याबद्दल राष्ट्रपतींनी नापसंती दर्शविल्याचे स्पष्टच दिसून येते. पहिल्यांदाच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जे घडले त्यावर राष्ट्रपती बोलले आहेत. राज्यसभेचे कामकाज ठप्प पडल्याची पार्श्वभूमी त्यामागे होती.शहांच्या धोरणाचा भाजपला लाभच्भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि अगदी जम्मू-काश्मीरमध्येही पक्षाची दारे खुली करीत अन्य पक्षांच्या असंतुष्ट नेत्यांना सामावून घेण्याचे धोरण अवलंबले. च्भाजपने ही राज्ये काबीज करीत पक्षाला लाभच झाल्याचे दाखवून दिले. गेली १५ वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपला दिल्लीत सत्तेवर आणण्यासाठी शहा यांनी हेच धोरण कायम ठेवले आहे.व्यवहार्य तोडगा शोधणे ही सर्वांची जबाबदारी वटहुकूम आणण्याचा मार्ग टाळण्यासाठी एखादा व्यवहार्य तोडगा शोधणे ही संपूर्ण संसदीय सदस्यांची जबाबदारी आहे़ विरोधकांजवळ संख्याबळ असेल तर ते विरोध करू शकतात. पण अंतिमत: जबाबदारी ही लोकसभेत प्रत्यक्ष निवडून गेलेले व राज्यांतून राज्यसभेवर गेलेले सदस्य यांची असते. - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपतीराहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल नाराजीबीरेंदरसिंग यांनी ४० वर्षांनंतर काँग्रेसला रामराम ठोकण्याचे कारण राहुल गांधी यांची कार्यशैली हेच सांगण्यात येते. त्यातच कृष्णा तीरथ यांच्या राजीनाम्याने सोमवारी दुपारी काँग्रेसला अचानक हादरा बसला. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांना केंद्रात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात येत असल्यानेच कुंपणावरील नेत्यांनी ही संधी शोधल्याचे मानले जाते.राष्ट्रपतींनी विरोधी पक्षांवर केलेल्या टीकेमुळे साहजिकच भाजपाच्या नेतृत्वाला आनंद झाला आहे. दिल्ली काँग्रेसमधील आघाडीच्या नेत्या दलित चेहरा मानल्या जाणाऱ्या कृष्णा तीरथ यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा आनंद द्विगुणित झाला.तीरथ यांचा भाजपाशी घरोबाच्तीरथ यांनी अचानक काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपाशी घरठाव करताना कुणावरही टीका करण्याचे टाळले, मात्र काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या काही निर्णयांवर त्या नाराज होत्या असे समजते. च्काँग्रेसने पक्षाची पडझड रोखण्यासाठी हालचाली चालविल्या असल्या तरी काँग्रेसचे आणखी काही नेते बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे.