मुंबई - बॉलिवूडचा इंटरनॅशनल खिलाडी अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी अक्षयने मोदींच्या खासगी जीवनाविषयकही अनेक प्रश्नांची विचारणा केली. त्यावेळी, पंतप्रधान मोदींनी पुण्यातील रिक्षावाल्याचा एक किस्साही सांगितला. पुण्यातील समाजवादी लोक स्वत:ला साधं, गरीब आणि सरळमार्गी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदींनी म्हटलं.
मी जे सांगत आहे ते कुणाचीही टिंगल किंवा टीका-टिपण्णी करण्याचा उद्देश नाही. पण, माझ्या जीवनात घडलेला हा प्रसंग असून खूप जुनी आठवण आहे ही. मी तेव्हा हाफ कुर्ता, पायजमा, पायात बूट, खांद्यावर पिशवी आणि चेहऱ्यावर दाढी अशा पोषाखात फिरत असे. एकदा मी पुण्यातील रेल्वे स्थानकावर उतरलो. हातात एक वर्तमानपत्र आणि खांद्यावर पिशवी अकडवून मी पुण्यातील आरएसएसच्या शाखेकडे निघालो होतो. मी चालतच निघालो होतो, तेव्हा एक रिक्षावाला माझ्यासोबत हळुहळू रिक्षा चालवत होता. मी 100 ते 200 मीटर पुढे चालत आलो, तरीही रिक्षावाला माझ्यासोबतच. त्यामुळे मी त्याला विचारला, भाई आपकी ऑटो मे कुछ प्रॉब्लम है क्या..? त्यावर तो म्हणाला तुम्ही रिक्षात नाही का बसणार ? मी उत्तरलो.. नाही मी तर चालत चाललो आहे. त्यांतर रिक्षावाल्यानं विचारलं, तुम्ही समजवादी आहात का ?. तर, मी म्हटलं नाही, मी अहमदाबादी आहे. पण, तुम्ही मला समाजवादी असं का विचारलं ?. त्यावर, रिक्षावाला म्हणाला पुण्यातील समाजवादी लोकं सर्वसामान्य लोकांसमोर रिक्षात बसत नाहीत. तर पुढे गेल्यानंतर गपचूप रिक्षात बसतात.
दरम्यान, अक्षय कुमारने दोन दिवसांपूर्वी एक ट्विट करुन खळबळ उडवून दिली होती. काहीतरी नवीन करतोय, असे म्हणत अक्षय कुमारे राजकीय प्रवेशाकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, त्यानंतर अक्षयनेच मी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले. तर, आज सकाळी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेऊन सर्वांनाचा आश्चर्याच धक्का दिला आहे.