शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

दहशत, हिंसा पसरवण्यात उच्चशिक्षितांचा सक्रीय सहभाग: पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 4:05 PM

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.

ठळक मुद्देभारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी नवीन शिक्षण धोरण - पंतप्रधानशिक्षणासोबत विचारसरणी महत्त्वाची - पंतप्रधानविश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

कोलकाता : जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे. विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधाननरेंद्र मोदी सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. (pm narendra modi addresses visva bharati university convocation ceremony)

विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला आमंत्रित केले, याबाबत खूपच आनंद होत आहे. कोरोना संकटामुळे प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहता आले असते, तर आणखीन छान झाले असते. परंतु, कोरोना नियमांमुळे या सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित झालो आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी नवीन शिक्षण धोरण 

देशामध्ये लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्ननिर्भर बनवण्यासाठी उत्तम आहे. शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. तुमची विचारसरणी तुम्हाला एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचं की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. 

गुन्हेगाराचे वय पाहून कारवाई करायची का; अमित शहा यांचा विरोधकांना सवाल

शिक्षणासोबत विचारसरणी महत्त्वाची

जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे तसेच हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रीय सहभाग वाढत चालला आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करत लोकांचा जीव वाचवण्यासाठी झटणारेही आहेत. तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता

तुम्ही केवळ एका विद्यापीठाचा भाग नसून, एका परंपरेचा भाग आहात हे कायम लक्षात ठेवावे. गुरुदेवांनी विश्व भारती विद्यापीठ असे नामकरण करण्यामागे विशेष उद्देश होता. या विद्यापीठातून जी व्यक्ती शिक्षण घेऊन बाहेर पडले, ती भारत आणि भारतीयत्वाबाबत नवीन दृष्टी जगाला देईल, अशी अपेक्षा गुरुदेव यांना होती. भ्रम, त्याग आणि आनंद या मूल्यांवर आधारित या विद्यापीठात भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी