शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

मोदी लाईव्ह येताच जेएनयूत 'जय श्रीराम', वंदे मातरम'च्या घोषणा; पंतप्रधान म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: November 12, 2020 8:00 PM

मोदींकडून जेएनयूच्या कॅम्पसमधील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचं व्हर्च्युअली अनावरण केलं. यानंतर मोदींनी जेएनयूच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोदी लाईव्ह येताच विद्यार्थ्यांनी 'जय श्रीराम', 'वंदे मातरम्'च्या घोषणा दिल्या. त्यानंतर मोदींनी तरुणांना 'स्वामी विवेकानंद अमर रहे'च्या घोषणा देण्यास सांगितलं.तरुणांनी देशाला प्रगतीकडे न्यावं ही स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं. स्वामीजींचा पुतळा त्यासाठी तरुणांना प्रेरणा देईल. भारत सशक्त-समृद्ध व्हावा, अशी स्वामीजींची इच्छा होती. त्यांचं ते स्वप्न साकार करण्यासाठी हा पुतळा तरुणांना प्रोत्साहित करेल. देशावर सर्वाधिक प्रेम करा, हा स्वामीजींचा सर्वोच्च संदेश होता. जेएनयूच्या प्रांगणात असलेला स्वामीजींचा पुतळा तोच संदेश तरुणांना देईल. यामुळे एकतेची भावना वाढीस लागेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.जेएनयूमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. विद्यापीठात होत असलेल्या निवडणुकांवरही डाव्या संघटनांचा वरचष्मा राहिलेला आहे. विद्यापीठात अनेकदा डाव्या संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात वादही झाले आहेत. यावर मोदींनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. 'राष्ट्रहितापेक्षा विचारधारा महत्त्वाची नसते,' असं मोदी म्हणाले. जेएनयूमधील स्वामीजींचा पुतळा सर्वांना प्रेरणा आणि ऊर्जा देईल. प्रत्येक व्यक्ती साहसी असावी, असं स्वामीजींना वाटायचं. स्वामींच्या पुतळ्यातून ते साहस आपण शिकावं. स्वामीजींकडून आपण करुणाभाव शिकावा, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjnu - jawaharlal nehru universityजेएनयू