शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

“सरकार बनविण्यासाठी नाही, देश घडवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागतात”; PM मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 06:05 IST

देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशाच्या वर्तमान व भविष्याबद्दल चिंता नसलेले लोक जलसंधारणाविषयी फक्त भाषणे देण्याचे काम करतात. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या लोकांनी काहीही प्रयत्न केले नाहीत़. सरकार बनविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. मात्र देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. 

गेल्या तीन वर्षांत देशाच्या ग्रामीण भागातील सात कोटी कुटुंबांना ‘हर घर जल’ योजनेद्वारे नळजोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे आता देशाने ग्रामीण भागातील घरांना १० कोटी नळजोडण्या देण्याचा टप्पा पार केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

जलसुरक्षा हा जगाला भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. विकसित भारत या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना जलसुरक्षा नसेल तर मोठी समस्या उद्भवू शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सात दशकांत ग्रामीण भागांतील फक्त तीन कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र तीन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन जाहीर केल्यानंतर सात कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारांवर केली. या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित होते.

२०२४च्या लाेकसभा निवडणुकीत होणार फायदा?

हर घर जल ही योजना ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाली. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांत २०२४च्या आधी ‘हर घर जल’ योजना राबवू इच्छिते. २००९ साली मनरेगा योजनेमुळे यूपीएचे केंद्रामध्ये पुन्हा सरकार स्थापन झाले. तर हर घर शौचालय, गरिबांना मोफत घर या योजनांमुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला लाभ झाला होता. गेल्या या तीन वर्षांत या कामासाठी ५१२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ‘हर घर जल’ योजनेमुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल अशी शक्यता त्या पक्षाला वाटत आहे. 

हर घर जल योजनेकडे बारीक लक्ष

- ग्रामीण भागांतील प्रत्येक घराला नळजोडण्या देतानाच त्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यावरदेखील केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हर घर जल योजनेच्या अंमलबजावणीवर वेबसाइट व ॲपच्या माध्यमातून केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवते. या योजनेबाबत तक्रारींचा लगेचच निपटारा केला जातो.

- दादरा-नगरहवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण भागातल्या सर्व घरांनाही नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण