शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

“सरकार बनविण्यासाठी नाही, देश घडवण्यास जास्त परिश्रम घ्यावे लागतात”; PM मोदींचा विरोधकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 06:05 IST

देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशाच्या वर्तमान व भविष्याबद्दल चिंता नसलेले लोक जलसंधारणाविषयी फक्त भाषणे देण्याचे काम करतात. हा प्रश्न सोडविण्यासाठी त्या लोकांनी काहीही प्रयत्न केले नाहीत़. सरकार बनविण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. मात्र देश घडविण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात,असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता लगावला. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले गोवा हे देशातील पहिले राज्य बनले आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. 

गेल्या तीन वर्षांत देशाच्या ग्रामीण भागातील सात कोटी कुटुंबांना ‘हर घर जल’ योजनेद्वारे नळजोडण्या देण्यात आल्या. त्यामुळे आता देशाने ग्रामीण भागातील घरांना १० कोटी नळजोडण्या देण्याचा टप्पा पार केला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. 

जलसुरक्षा हा जगाला भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. विकसित भारत या आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना जलसुरक्षा नसेल तर मोठी समस्या उद्भवू शकते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सात दशकांत ग्रामीण भागांतील फक्त तीन कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र तीन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन जाहीर केल्यानंतर सात कोटी घरांना नळजोडण्या देण्यात आल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच्या सरकारांवर केली. या कार्यक्रमाला केंद्रीय जलशक्ती खात्याचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उपस्थित होते.

२०२४च्या लाेकसभा निवडणुकीत होणार फायदा?

हर घर जल ही योजना ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झाली. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांत २०२४च्या आधी ‘हर घर जल’ योजना राबवू इच्छिते. २००९ साली मनरेगा योजनेमुळे यूपीएचे केंद्रामध्ये पुन्हा सरकार स्थापन झाले. तर हर घर शौचालय, गरिबांना मोफत घर या योजनांमुळे २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपला लाभ झाला होता. गेल्या या तीन वर्षांत या कामासाठी ५१२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. ‘हर घर जल’ योजनेमुळे २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होईल अशी शक्यता त्या पक्षाला वाटत आहे. 

हर घर जल योजनेकडे बारीक लक्ष

- ग्रामीण भागांतील प्रत्येक घराला नळजोडण्या देतानाच त्यांना नियमित पाणीपुरवठा होण्यावरदेखील केंद्र सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. हर घर जल योजनेच्या अंमलबजावणीवर वेबसाइट व ॲपच्या माध्यमातून केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवते. या योजनेबाबत तक्रारींचा लगेचच निपटारा केला जातो.

- दादरा-नगरहवेली व दमण-दीव या केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण भागातल्या सर्व घरांनाही नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारण