शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"विरोधकांना भारताची इतकी चिंता असती, तर विदेशात जाऊन बदनामी केली असती का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:21 IST

पंतप्रधान मोदींची विरोधकांच्या INDIA आघाडीवर टीका

PM Modi in Rajasthan: पंतप्रधान नरेंद्र मोदीराजस्थानच्या सीकरमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात श्याम बाबांच्या जयजयकाराने केली. पण त्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीच्या 'इंडिया'वर हल्लाबोल केला. "विरोधकांना जर भारताची चिंता असती तर त्यांनी परदेशात जाऊन भारताबद्दल वाईट विधाने केली असती का? त्यांना भारताची काळजी असती तर त्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असते का? जर त्यांना भारताची काळजी असते तर त्यांनी गलवानमधील जवानांच्या हौतात्म्यावर प्रश्न विचारले असते का? काँग्रेस आणि त्यांचे मित्रमंडळी अशा फसव्या आश्वासनांच्या धर्तीवर काम करत आहेत, ज्यात एका घोटाळ्याचे नाव बदलून दुसऱ्या नावाने नवीन घोटाळा सुरू केला जाऊ शकतो. 'इंडिया' आघाडीची तुलना ईस्ट इंडिया कंपनीशीच केली जाऊ शकते," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

मोदी पुढे म्हणाले, "राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यापासून विकासकामात अडथळे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मी राजस्थानच्या जनतेला वचन दिले होते की मी प्रत्येक घराला एक नळ कनेक्शन देईन, पण राजस्थान सरकारला ते अडवून ठेवायचे आहे. राजस्थानमध्ये तरुणांच्या भविष्याशी खेळले जात आहे. पेपर लीकचा उद्योग केला जात आहे. राजस्थानचे तरुण सक्षम आहेत, मात्र येथील सरकार त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. येथे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनीच पेपर लीक माफियांवर कृपा केल्याचा आरोप जात आहे. पेपर लीक माफियांपासून तरुणांना वाचवण्यासाठी काँग्रेसला हटवावेच लागेल."

"केंद्र सरकार राजस्थानच्या विकासासाठी सतत पैसे पाठवत आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना १० वर्षांत राजस्थानला फक्त १ लाख कोटी रुपये कर वाटा म्हणून देण्यात आले. गेल्या 9 वर्षात भाजपा सरकारने राजस्थानला कर वाटा म्हणून 4 लाख कोटींहून अधिक रक्कम दिली आहे. 10 वर्षे केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना राजस्थानला केवळ 50,000 कोटी केंद्रीय अनुदान म्हणून दिले होते, आमच्या सरकारने 9 वर्षात केंद्रीय अनुदानाच्या रूपात राजस्थानला 1.5 लाख कोटींहून अधिक निधी दिला आहे," अशी आकडेवारीही मोदींनी सांगितली.

"ही ऋषीभूमी आहे. या भूमीने भैरोसिंह शेखावत यांच्यासारखे नेते, उपराष्ट्रपती देशाला दिले आहेत. इथे आल्यावर दैवी अनुभूती मिळते आणि तुमचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे मला विश्वास आहे की राजस्थानमध्ये कमळ फुलणार आहे, राजस्थानमध्ये सत्तापरिवर्तन होणार आहे. येथे उपस्थित असलेला प्रचंड समुदाय हेच सांगत आहे," असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा