शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 16:21 IST

'गेल्या 6 वर्षात मोदी सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले नाहीत.'

ठळक मुद्देपीएम केअर्स फंड एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

नवी दिल्ली : पीएम केअर्स फंड एनडीआरएफमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्वागत केले. यावेळी पंतप्रधान केअर्स फंडमधून कोरोनाच्या लढाईत आतापर्यंत 3100 कोटी रुपयांची मदत झाली आहे. त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, "50 हजार व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले असून स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी खरेदी आहे. स्थलांतरित मजुरांना मदत करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. लस संशोधनासाठी 100 कोटी रुपये देण्यात आले. पीएम कॅअर्स फंड पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्याचे प्रमुख पंतप्रधान आहेत."

लोकांनी स्वेच्छेने पीएम केअर्स फंडसाठी देणगी दिली. गेल्या 6 वर्षात मोदी सरकारवर कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले नाहीत. सर्व गोष्टी पारदर्शकतेने घडत आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य करत रविशंकर प्रसाद म्हणाले, "कोरोनाविरूद्धच्या लढाईत राहुल गांधींनी पहिल्या दिवसापासूनच देशाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे."

याचबरोबर, पंतप्रधानांनी डॉक्टर, नर्स आणि कोरोनाचा सामना करणाऱ्यांसाठी थाळी वाजविण्यासाठी सांगितले, तर राहुल गांधी यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतप्रधानांच्या सांगण्यावरून जेव्हा संपूर्ण देशाने कोरोनाविरूद्ध आशेचा दीप प्रज्वलित केला तेव्हा राहुल गांधी म्हणाले, तुम्ही ते का पेटवित आहात? राहुल गांधींनी कोरोना लढा कमकुवत करण्यासाठी कसलीही कसर सोडली नाहीत, असा आरोप करत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयाने पीएम केअर्स फंडविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावत म्हटले आहे की,  नोव्हेंबर 2019 मध्ये तयार करण्यात आलेले एनडीआरएफ कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी पुरेसे आहे. कोणतीही नवीन कृती योजना आणि किमान मानकांना वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदी