इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगासमोर इंधन टंचाईचं संकट आ वासून उभं आहे. भारतातही एलपीजी, पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवा पसरल्याने गॅस एजन्सी तसेच पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागत आहेत. देशात पेट्रोल टंचाईचं चित्र निर्माण झालेलं दिसत असतानाच उत्तर प्रदेशमध्ये महामार्गावर एक धक्कादायक प्रकार घडला. महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणाऱ्या एका टँकरला अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली. अपघातग्रस्त टँकरचा ड्रायवर मदतीसाठी हाका मारत होता. मात्र तिथे असलेले लोक त्याला मदत करण्याऐवजी बादल्या घेऊन पेट्रोल गोळा करण्यासाठी टँकरकडे धावले. त्यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. तसेच वाहतुकीचीही कोंडी झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी रात्री कानपूरमधील महामार्गावर काही बिघाड झाल्याने पेट्रोल वाहून नेणारा टँकर चालकाने रस्त्याच्या कडेला उभा केला होता. यादरम्यान, एका भरधाव वाहनाने टँकरला धडक दिली. त्यामुळे टँकरमधून पेट्रोलची गळती सुरू झाली. तसेच रस्त्यावर पेट्रोल पसरू लागले.
अपघातानंतर टँकर चालकाने स्थानिकांना मदतीची विनंती केली. मात्र आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीसाठी न येता आजूबाजूच्या घरातून बादल्या आणि डबे घेऊन आले. तसेच टँकरमधून गळत असलेलं पेट्रोल गोळा करू लागले. सध्या पेट्रोलच्या टंचाईच्या बातम्या येत असल्याने हे पेट्रोल आपल्याला उपयुक्त ठरेल, असे या लोकांनी सांगितले.
दरम्यान, वारंवार विनवण्या करूनही कुणी ऐकत नसल्याने अखेरीस ड्रायव्हरने पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पेट्रोल मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सांडलं होतं. तसेच त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
Web Summary : Amidst fuel shortage rumors, a tanker accident in Uttar Pradesh led to locals rushing to collect spilled petrol instead of helping the driver. Police and firefighters arrived to control the situation, averting a potential disaster as people prioritized personal gain over safety.
Web Summary : ईंधन की कमी की अफवाहों के बीच, उत्तर प्रदेश में एक टैंकर दुर्घटना के बाद स्थानीय लोग ड्राइवर की मदद करने के बजाय बिखरा हुआ पेट्रोल इकट्ठा करने दौड़े। पुलिस और दमकलकर्मी स्थिति को नियंत्रित करने के लिए पहुंचे, जिससे संभावित आपदा टल गई क्योंकि लोगों ने सुरक्षा से ज्यादा निजी लाभ को प्राथमिकता दी।