शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

Oxygen Shortage: देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला; संसदेत केंद्र सरकारची पहिल्यांदाच स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 11:41 IST

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता.

ठळक मुद्देदेशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही असं यापूर्वी केंद्रानं म्हटलं होतं.केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला घेरलं होतंकेंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता.

नवी दिल्ली – आंध प्रदेशात ऑक्सिजन(Oxygen) च्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय(Health Ministry) ने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्राल्याने सांगितले की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी आंध्र प्रदेश सरकारद्वारे केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. जी संसदेद्वारे सभागृहात मांडण्यात येत आहे. १० मे २०२१ रोजी SVRR हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासणीत समोर आलं की, ऑक्सिजन टँक आणि बॅकअप सिस्टममध्ये झालेल्या बदलामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात प्रेशर कमी झाला. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण आली.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत म्हटलं होतं की, राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही. परंतु राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं होतं हे मान्य केले होते. मात्र कुठल्याही रुग्णाच्या मृत्यूसाठी हे कारण नव्हतं. केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता. तर राज्य सरकारने जी माहिती दिली तीच केंद्र सरकारनं संसदेत सादर केली असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता.

केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली होती. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले होते. मोदी सरकारने राज्य सरकारांकडून खरे आकडे मागितले. राज्य सरकारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन न मिळाल्याने किती रुग्णांचा मृत्यू झाला याची आकडेवारी मागितल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवीरी पावसाळी अधिवेशनातच मांडली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं, अखेर ही आकडेवारी संसदेत मांडली गेली.

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली होती.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या