शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Oxygen Shortage: देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाला; संसदेत केंद्र सरकारची पहिल्यांदाच स्पष्ट कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 11:41 IST

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता.

ठळक मुद्देदेशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही असं यापूर्वी केंद्रानं म्हटलं होतं.केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला घेरलं होतंकेंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता.

नवी दिल्ली – आंध प्रदेशात ऑक्सिजन(Oxygen) च्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालय(Health Ministry) ने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांना जीव गमवावा लागला होता.

केंद्रीय आरोग्य मंत्राल्याने सांगितले की, ९ ऑगस्ट २०२१ रोजी आंध्र प्रदेश सरकारद्वारे केंद्र सरकारला माहिती देण्यात आली आहे. जी संसदेद्वारे सभागृहात मांडण्यात येत आहे. १० मे २०२१ रोजी SVRR हॉस्पिटलमध्ये काही रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीच्या तपासणीत समोर आलं की, ऑक्सिजन टँक आणि बॅकअप सिस्टममध्ये झालेल्या बदलामुळे ऑक्सिजन पुरवठ्यात प्रेशर कमी झाला. त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यात अडचण आली.

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत म्हटलं होतं की, राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात कुठल्याही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेला नाही. परंतु राज्य सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचं संकट उभं राहिलं होतं हे मान्य केले होते. मात्र कुठल्याही रुग्णाच्या मृत्यूसाठी हे कारण नव्हतं. केंद्र सरकारने दिलेल्या या उत्तरामुळे विरोधकांनी गोंधळ केला होता. विरोधकांनी केंद्राच्या या उत्तरावरून निशाणा साधला होता. तर राज्य सरकारने जी माहिती दिली तीच केंद्र सरकारनं संसदेत सादर केली असा दावा भाजपाकडून करण्यात येत होता.

केंद्रीय मंत्र्यांनी ऑक्सिजन टंचाईमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटल्याने विरोधकच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही सरकारला उघडपणे घेरण्यास सुरुवात केली होती. या मुद्द्यावरून संकटात आल्याने केंद्र सरकारने देखील यावर कडक पाऊल उचलले होते. मोदी सरकारने राज्य सरकारांकडून खरे आकडे मागितले. राज्य सरकारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) ऑक्सिजन न मिळाल्याने किती रुग्णांचा मृत्यू झाला याची आकडेवारी मागितल्याचे सूत्रांनी सांगितलं होतं. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन न मिळाल्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवीरी पावसाळी अधिवेशनातच मांडली जाऊ शकते असं म्हटलं जात होतं, अखेर ही आकडेवारी संसदेत मांडली गेली.

काँग्रेसचे खासदार केसी वेणुगोपाल (KC Venugopal) यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूंच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत सरकारसमोर सवाल उपस्थित केला होता. यावर आरोग्य मंत्रालयाकडून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारकडून २८ मेपर्यंत १०,२५० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला आहे. सर्वाधिक १२०० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांना पुरविण्यात आला, तर दिल्लीला ४०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला अशीही माहिती केंद्रानं संसदेत दिली होती.

टॅग्स :Oxygen Cylinderऑक्सिजनNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या