शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

''पाकव्याप्त काश्मीर आमचेच; एक दिवस ताब्यात येईलच''

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 06:34 IST

पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानने बळकाविलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, अशी भारताची ठाम भूमिका आहे. हे पाकव्याप्त काश्मीरही एक दिवस आमच्या ताब्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले. मोदी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी असेही सांगितले की, दहशतवाद बंद झाल्याखेरीज पाकिस्तानशी कोणतीही बोलणी होणार नाहीत आणि जेव्हा केव्हा बोलणी होतील, तेव्हा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असतील. हे या आधीही अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे.आम्ही चर्चेचा प्रस्ताव दिला होता, पण भारताने तो अव्हेरला, असे पाकिस्तान म्हणते. त्याविषयी विचारता परराष्ट्रमंत्री म्हणाले की, कोणतीही कृती न करता ते फक्त बोलतात हीच खरी समस्या आहे. भारताची भूमिका अवाजवी किंवा जगावेगळी मुळीच नाही. शेजारी देश आपल्याविरुद्ध कितीही उचापती करत असला तरी त्याच्याशी चर्चा करणारा एकही देश जगात तुम्हाला सापडणार नाही. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करणे हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याबद्दल कोण काय बोलते याची आम्ही चिंता करत नाही. अमेरिका व भारताचे संबंध अतिशय चांगले आहेत. संबंध जसे दृढ होतात तसे काही मुद्देही समोर येतात. त्या मुद्द्यांवर अमेरिकेशी चर्चा करून तोडगा काढू असेही जयशंकर म्हणाले.डॉ. नाईक भारतास हवेच आहेतअतिरेकी कारवायांना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून खटले सुरू असलेले वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक हे भारतास नक्कीच हवे आहेत व त्यांच्या प्रत्यार्पणासाठीही भारत आग्रही आहे असेही जयशंकर यांनी स्पष्ट केले. डॉ. नाईक यांचे वास्तव्य सध्या मलेशियात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच भेट झाली पण डॉ. नाईक यांच्या प्रत्यार्पणाविषयी त्यांनी काही विषय काढला नाही. नाईक यांना स्वीकारायला कोणताच देश तयार नाही. त्यामुळे त्यांचे प्रत्यार्पण करायचे म्हटले तरी त्यांना पाठवायचे कुठे असा प्रश्न असल्याचे वक्तव्य मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांनी केले आहे. याचे ठाम खंडन जयशंकर यांनी केले. रशियात मोदी महाथीर यांना भेटले तेव्हा नाईक यांच्या प्रत्यार्पणाचा विषय निघाला होता व ते भारताला हवे आहेत असे स्पष्ट केले होते असे जयशंकर म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर