शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:40 IST

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे.

Pahalgam Terror Attack: मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल म्हणून पाच वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्त एका मुलाखतीत त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल उघडपणे भाष्य केले. सिन्हा यांनी पहलगाम हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली असून, ही एक मोठी सुरक्षा चूक असल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाही तर भारताच्या आत्म्यावर हल्ला केला आहे.

हा देशाच्या आत्म्यावर हल्लामनोज सिन्हा पुढे म्हणाले की, मी या घटनेची संपूर्ण जबाबदारी घेतो, कारण ती सुरक्षेची मोठी चूक होती. ज्या ठिकाणी हल्ला झाला, ते एक मोकळे मैदान होते. त्यामुळेच, तिथे सुरक्षा दलांसाठी कोणतीही सुविधा किंवा जागा करण्यात आली नव्हती. पाकिस्तानने फक्त पर्यटकांवरच नाही, तर देशाच्या आत्म्यावर हल्ला केला. परंतु भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला स्पष्टपणे इशारा दिला की, भारत आता कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला सहन करणार नाही.

राज्याच्या अर्थव्यवस्था वाढलीपर्यटकांच्या जास्तीत जास्त येण्याने राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होत आहे. येथील अर्थव्यवस्था पूर्वीपेक्षा दुप्पट झाली आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा एक मुख्य उद्देश राज्याच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धक्का देणे हा होता. या हल्ल्याचा आणखी एक उद्देश देशाच्या इतर भागात राहणाऱ्या लोकांना जम्मू-काश्मीरविरुद्ध भडकवणे आणि देशभरात जातीय फूट पाडणे हा होता. पाकिस्तानला जम्मू-काश्मीरची भरभराट होऊ द्यायची नाही, असेही त्यांनी म्हटले.

स्थानिकांचा सहभाग होता का?मनोज सिन्हा म्हणाले की, एनआयएने या हल्ल्यात अनेक स्थानिक लोकांचा सहभाग असल्याचे उघड केले आहे. काही लोकांच्या सहभागाचा अर्थ असा नाही की, संपूर्ण राज्य वाईट आहे आणि येथील सुरक्षा वातावरण प्रदूषित झाले आहे. परिस्थिती बरीच सुधारली आहे. यावेळी एका व्यक्तीचा सहभाग आढळून आला आहे. गेल्या वर्षी ही संख्या ६-७ होती आणि एकेकाळी ती १०० पेक्षा जास्त होती. हेदेखील खरे आहे की, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर राज्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घुसवले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आता दहशतवादी हल्ले सहन करणार नाहीभारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानसाठी लाल रेषा आखली आहे. आमच्या सैन्याने त्यांच्या घरात घुसून त्यांचा एअरबेस उद्ध्वस्त केला आणि पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला की, आम्ही आता कोणताही दहशतवादी हल्ला स्वीकारणार नाही. पाकिस्तान हा असा देश आहे, ज्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही. गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि आमच्या गुप्तचर संस्था पाकिस्तानवर बारीक लक्ष ठेवून आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

काँग्रेसचा सरकारवर निशाणा काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मनोज सिन्हा यांच्या विधानावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. खेडा म्हणाले की, हल्ल्याच्या ८२ दिवसांनंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली. असे करून ते दिल्लीत कोणाचे रक्षण करत आहेत? त्यांना जबाबदार धरण्यासाठी किती दिवस, आठवडे, महिने लागतील? ही जबाबदारी घेतल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागेल की बडतर्फ करावे लागेल? असा खोचक सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानIndiaभारत