शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
2
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
3
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
4
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
5
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
6
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
7
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
8
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
9
Ayodhya Ram Mandir: अयोध्येचे राम मंदिर होऊन वर्ष होत आले, मग ध्वजारोहण सोहळा आता का? 
10
इन्फोसिस-एसबीआयसह 'हे' ५ शेअर्स करणार मोठी कमाई; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
11
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
12
ipad Air: ऑफरने ग्राहकांचाच 'गेम' केला! आधी ७९,९९० चा आयपॅड १५०० रुपयांत दिला, आता रिटेलर म्हणतो...
13
रुग्णवाहिकेतून उतरवले; ओल्या बाळंतीणीची बाळासह २ किमी पायपीट, रुग्णवाहिका चालकाची कमालीची अमानुषता
14
Champashashthi 2025: २६ नोव्हेंबर चंपाषष्ठी, खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता; 'अशी' करा पूजा!
15
इथिओपियाहून भारतात आलेले राखेचे ढग कधी कमी होणार? या शहरांवर परिणाम होणार, हवामान विभागाने दिली माहिती
16
मोठी बातमी! अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
17
३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा 'ही' आर्थिक कामं, अन्यथा मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं
18
MNS: राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला गाठलं आणि रस्त्यावरच...
19
Mumbai: दुचाकीस्वाराचं अपहरण करून लैंगिक सुखाची मागणी; वांद्रे पोलिसांकडून ऑडीचालकाला अटक
20
"डीके शिवकुमार पक्ष बदलून आले तर मी...", भाजपाच्या दिग्गज नेत्याने दिला इशारा, काँग्रेसमध्ये खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 22:09 IST

Pahalgam Terror Attack: सिंधू पाणी करारासंदर्भात आज अमित शाहांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक झाली.

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी(25 एप्रिल) गृहमंत्री अमित शाहा यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्र मंत्री, जलशक्ती मंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाहीकेंद्रीय जलसंपदा मंत्री सीआर पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सीआर पाटील म्हणाले की, सिंधू पाणी कराराबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यात लागू केला जाईल. तात्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल. 

जागतिक बँकेला माहिती दिली जाईलदरम्यान, भारतातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवल्यानंतर धरणांची क्षमता वाढवली जाईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून जास्त पाणी साठवता येईल. यासाठी धरणांमधील गाळ काढला जाईल. धरणांचे फ्लशिंगदेखील केले जाईल. हा करार जागतिक बँकेने केला होता, त्यामुळे त्यांनाही भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली जाईल. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाAmit Shahअमित शाहIndiaभारतPakistanपाकिस्तान