शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

पॅकेजमुळे वाढलेल्या महागाईने पराभव

By admin | Updated: March 8, 2015 23:06 IST

तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज

नवी दिल्ली : तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज कारणीभूत ठरले. वित्तीय आणि महसुली तूट भरून काढण्यासाठी पॅकेजचा डोस देण्यात आला; मात्र त्याची परिणती महागाई वाढण्यात झाली, त्यामुळेच जनतेने सरकारला धडा शिकविला असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. उपरोक्त काळात प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते. हा सरकारचा सामूहिक निर्णय होता, असे सांगत चिदंबरम यांनी मुखर्जींच्या नावाचा थेट उल्लेख टाळला.मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना चेन्नईच्या लोयाला इन्स्टिट्यूट आॅफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (लिबा) येथे ते बोलत होते. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाने समानता, आर्थिक स्थैर्याची कसोटी उत्तीर्ण केलेली नाही. त्यात काही बाबी चांगल्या असल्या तरी असमानता वाढीस लागणार आहे. मुखर्जी अर्थमंत्री असताना २००८ मध्ये आर्थिक आघाडीवर बिकट परिस्थिती उभी ठाकल्याने सरकारने विविध पॅकेजची घोषणा केली होती. चिदंबरम यांनी आर्थिक पॅकेजची परिणती महागाईत भरमसाठ वाढ होण्यात झाली. त्यानंतर निवडणुकीत जनतेने संपुआ सरकारला शिक्षा ठोठावली असे स्पष्ट केले. आर्थिक तूट तीन टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य जेटलींनी आणखी वर्ष म्हणजे २०१७-१८ पुढे ढकलले आहे. संपुआ सरकारने २०१५-१६ या वर्षासाठी आर्थिक तुटीचे लक्ष्य ३.६ टक्के निश्चित केले असताना या सरकारने ते ३.९ टक्के निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)