शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

स्टेशनवर आयोजित करा विवाह सोहळा आणि अन्य समारंभ

By admin | Updated: December 29, 2016 00:51 IST

रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड

नवी दिल्ली : रेल्वे स्टेशन म्हणताच, डोळ्यासमोर येतो तिथला गोंधळ, कलकलाट, गाड्या येताच होणारी धावपळ आणि एक विशिष्ट वास. मोठ्या शहरांमध्ये प्रत्येक प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी, उभे राहायलाही नसलेली जागा आणि उपनगरी गाडी येताच त्यातून उतरण्यासाठी आणि आत शिरण्यासाठी उडणारी झुंबड. अशा रेल्वे स्टेशनवर कुणाच्या विवाह समारंभ आयोजित करावा, असा विचार आतापर्यंत कोणाच्या मनातही डोकावला नसेल. पण यापुढे रेल्वे स्टेशनवरही विवाह सोहळे आणि बँड, बाजा, बारात हे चित्र पाहायला मिळाले, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. प्लॅटफॉर्मवर यज्ञासमोर बसून भटजी मंत्र पुटपुटत आहेत, आंतरपाट धरून काही जण उभे आहेत, दोन्ही बाजुंना वधू-वर हातात हार धरून उभे आहेत, सात प्रदक्षिणा घेत आहेत, सात जन्म एकत्र राहण्याचे वचन एकमेकांना देत आहेत, मंगलाष्टके सुरू असताना हातात अक्षता असलेल्यांची गर्दी आणि एकमेकांना हार घालताच सुरू होणारा सनई-चौघडा आणि त्यानंतर लगेचच जेवणाच्या पहिल्याच पंगतीत बसण्यासाठी काहींची धावपळ असे चित्र रेल्वे प्लॅटर्फार्मवर पाहायला मिळू शकेल. किंबहुना विवाह सोहळ्यांसाठी रेल्वेचे प्लॅटफॉर्म देण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने सुरूही केली आहे. याच्याच तयारीला सध्या रेल्वे मंत्रालय लागले आहे. त्यामुळे आता लवकरच किमान या २00 रेल्वे स्टेशनवर मंगलाष्टके आणि सनई चौघडे ऐकू येण्याची शक्यता आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) - नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे विकास शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी रेल्वेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच काही सल्लेही दिले होते. त्यातूनच रेल्वेने आपले उत्पन्न वाढवण्यासाठी स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य सोहळ्यांसाठी देण्याचा विचार करावा, अशी कल्पना समोर आली. २00 स्टेशन मोकळीच!- रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास आठ हजार रेल्वे स्टेशन्स आहेत. यापैकी किमान २00 स्टेशनवर दिवसातून एक वा दोन गाड्याच येतात वा तिथे थांबतात. या स्टेशनवर प्लॅटफॉर्मशिवाय बरीच जागा उपलब्ध असून, तिचा क्वचितच वापर केला जातो. या स्टेशनकडून रेल्वेला फारसे उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे ही रेल्वो स्टेशन नफ्यात आणण्यासाठी त्यांचे प्लॅटफॉर्म लग्नकार्य आणि अन्य सोहळ्यांसाठी देण्याच्या कल्पनेवर रेल्वे विचार करत आहे. यातील काही रेल्वे स्टेशन ग्रामीण भागात आहेत. तिथे सहजच या स्टेशनचा वापर लग्नकार्य किंवा अन्य कार्यक्रमांसाठी करता येईल, असे केल्यामुळे रेल्वेचे उत्पन्न होईल आणि दुसरीकडे लोकांना चांगली सुविधाही मिळू शकेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे.