शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 6:40 AM

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. संसद अधिवेशनाआधी केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले, ज्या लोकांची नजर मे २०१९ वर आहे त्यांनी वाद-विवाद घालावा; परंतु संसद सभागृहात संवाद करावा.भाजपाच्या सूत्रांनुसार संसद सत्राच्या पहिल्या दिवशीच संवादाचा उल्लेख करून २०१९ च्या तयारीचे संकेत मोदी यांनी दिले आहेत. याचा अर्थ असा की, मोदी या निकालांना भाजपासाठी अंतिम मानत नाहीत. या निकालांनी मोदी यांची जादू संपली, असे जे कोणी समजत असतील ते चूक आहेत. याचे कारण असे की, छत्तीसगड वगळता राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला ज्या जोरदार यशाची आशा होती ती धुळीस मिळाली. ही परिस्थिती मोदी यांच्या सभा आणि जनसंपर्क सभांमुळे निर्माण झाली. मोदी जेथे गेले तेथे मतांमध्ये ४-५ टक्के वाढ झाली. परिणामी, भाजपा पुन्हा स्पर्धेत आला आहे.लोकांचा राग हा राज्याच्या नेतृत्वावर आहे. मोदी यांच्यावरील विश्वास कायम आहे. यामुळेच राजस्थानात काँग्रेसला आधी १५० जागा मिळतील असे दावे होते. तेथे मोदी यांच्या दौऱ्यांमुळे कसाबसा तो विजयाजवळ गेला. मध्यप्रदेशातही हीच स्थिती होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका विरोधकांना २०१४ प्रमाणे कठीण जाणार असल्याचे भाजपातील सुत्रांनी नमूद केले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदcongressकाँग्रेस