शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

सरकारविरुद्ध विरोधक संसदेत, रस्त्यांवरही होणार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 05:56 IST

हिवाळी अधिवेशन; वाढती बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून सामूहिक रणनीती

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : देशात वाढती बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून सामूहिक रणनीती अंतर्गत संसदेच्या हिवाळी अधिवेशात संसदेत आणि संसदेबाहेर सरकारविरोधात विरोधक आक्रमक होणार आहेत. हा निर्णय सोमवारी १३ राजकीय पक्षांनी आपल्या एकत्रित बैठकीत घेतला. या पक्षांचे म्हणणे होते की, वेळेअभावी इतर पक्षांसोबत समन्वय न झाल्यामुळे काही पक्ष बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारवर केल्या जाणाºया ‘हल्ला बोल’ची अंतिम रणनीती हिवाळी अधिवेशनात निश्चित केली जाईल.

बैठकीनंतर काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले की, सगळ््या पक्षांचे मत होते की जोपर्यंत सर्वांचे एकच धोरण ठरवून सरकारवर हल्ला केला जाणार नाही तोपर्यंत सरकार हलणार नाही. त्यांनी वाढती बेरोजगारी, वाईट होत चाललेली अर्थव्यवस्था, मुक्त व्यापार करारासारख्या मुद्यांवर भर देऊन म्हटले की, नोटाबंदीनंतर देश सगळ््यात वाईट कालखंडातून प्रवास करीत आहे. खासगी गुंतवणूक घसरत चालली आहे, वसूल न होणारे कर्ज आठ लाख कोटीं रूपयांपर्यंत गेले आहे, बँक घोटाळ््यांची संख्या वाढून २५ हजार झाली आहे तरीही मोदी सरकार महसूल गिळाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीवर दरोडा टाकत आहे, असे आझाद म्हणाले.जगात जेवढी सरासरी बेरोजगारी आहे त्याच्या दोनपट बेरोजगारी भारतात आहे. सरकारी आकडे वस्तुस्थितीपासून दूर आहेत.शरद यादव यांचे म्हणणे होते की, देशाची परिस्थिती इतकी बिघडली आहे की, आता लोकांनाच एकत्र यावे लागेल. हरयाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुकांत मतदारांनी जो जनादेश दिला त्यातून लोकांना आता घराबाहेर यायचे आहे याचे संकेत मिळतात. आता नेत्यांची जबाबदारी ही आहे की लोकांच्या भावना समजून देशभर आंदोलन उभे करावे.

बैठकीत १३ पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यात गुलाम नबी आझाद, अहमद पटेल, रणदीप सूरजेवाला (काँग्रेस), डी. कुपेंद्र रेड्डी (जेडीएस), शरद यादव (एलजेडी), टीआर बालू (डीएमके), मनोज झा (आरजेडी), नदिमुल्ला हक (टीएमसी), अजित सिंह (आरएलडी), टी. के. रंगराजन (सीपीआईएम), डी. राजा (सीपीआय), उपेंद्र कुशवाहा (आरएलएसपी), पी. के. कुनहलकुट्टी (आईयूएमएन), के. मणी (केसीएग) आणि शत्रुजीत सिंह (आरएसपी).

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस