शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:40 IST

Operation Sindoor ISRO : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही महत्वाची माहिती दिली.

Operation Sindoor ISRO : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अतंर्गत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्धविराम घोषित झाला असला तरी, धोका अजून टळलेला नाही. याच पार्श्वभूमीवर ISRO चे 10 डोळे चोवीस तास पाकिस्तानच्या बारीक-सारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. इस्रोचे प्रमुख व्ही. नारायण यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे.

आगरतळा येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या (CAU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी सांगितले की, तुम्हा सर्वांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या 7,000 किलोमीटरच्या समुद्री क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे साध्य करू शकत नाही. त्यामुळेच सुरक्षेसाठी धोरणात्मक उपाय म्हणून, इस्रोचे 10 उपग्रह चोवीस तास सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत."

भारताने 127 उपग्रह प्रक्षेपित केलेआतापर्यंत इस्रोने एकूण 127 भारतीय उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामध्ये खाजगी ऑपरेटर आणि शैक्षणिक संस्थांचे उपग्रह देखील समाविष्ट आहेत. यापैकी 22 लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आणि 29 जिओ-सिंक्रोनस अर्थ ऑर्बिट मध्ये आहेत, जे केंद्र सरकारच्या मालकीचे आहेत. भारताकडे सुमारे एक डझन गुप्तचर किंवा पाळत ठेवणारे उपग्रह आहेत. यामध्ये कार्टोसॅट आणि आरआयएसएटी सीरिज, तसेच एमिसॅट आणि मायक्रोसॅट सीरिजचा समावेश आहे. 

52 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार काही दिवसांपूर्वीच इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) चे अध्यक्ष पवन कुमार गोएंका यांनी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 मध्ये सांगितले होते की, भारत पुढील पाच वर्षांत 52 उपग्रह लॉन्च करणार आहे. याद्वारे भारताची देखरेख क्षमता वाढेल. आपल्याकडे आधीच खूप मजबूत क्षमता आहेत, फक्त त्या सतत वाढवण्याची गरज आहे. या योजनेचा उद्देश संरक्षण क्षेत्राच्या देखरेखीच्या क्षमता वाढवणे हा आहे. नवीन उपग्रहांमुळे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाला शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास, सीमांवर लक्ष ठेवण्यास आणि लष्करी कारवायांमध्ये रिअल-टाइम समन्वय सुधारण्यास मदत होईल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाisroइस्रोPakistanपाकिस्तानIndiaभारत