शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 00:19 IST

Operation Sindoor: आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असलेल्या रॉयटर्सनेभारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जाहीर केला आहे.

गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच बदला घेताना भारतीय सैन्य दलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानमध्ये जोरदार एअरस्ट्राईक केली होती. ऑपरेशन सिंदूर नाव देत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, या हल्ल्यात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तरी या हल्ल्यात किती जण मृत्युमुखी पडले याची नेमकी आकडेवारी समोर येत नव्हती. दरम्यान, आता आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था असलेल्या रॉयटर्सने पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा जाहीर केला आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४६ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती रॉयटर्सने पाकिस्तानी सैन्यातील एका प्रवक्त्याच्या हवाल्याने दिली आहे. 

दरम्यान, पहलगाममधील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यांना लक्ष्य करत एअर स्ट्राईक केली होती. या हल्ल्यादरम्यान, मुरिदके, बहावलपूर पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद आदी ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले आहेत.  

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीIndiaभारत