'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 08:37 IST2025-06-24T08:36:10+5:302025-06-24T08:37:44+5:30

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. दरम्यान, भारत 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत आपल्या नागरिकांना परत आणत आहे. सोमवारी महान एअरच्या विशेष विमानाने २९० प्रवासी दिल्लीत पोहोचले.

Operation Sindhu accelerated, 290 Indians brought back from Iran; Sri Lankan woman included in the list | 'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश

इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव सुरू आहे. युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी चालवले जाणारे ऑपरेशन सिंधू सुरूच आहे. सोमवारी रात्री महान एअरचे एक विशेष विमान २९० प्रवाशांसह इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

भारताने आतापर्यंत २००३ भारतीयांना इराणमधून परत आणले आहे. दिल्लीला पोहोचलेल्या प्रवाशांमध्ये श्रीलंकेची एक महिला फातिमा इमान देखील आहे. भारत सरकारचे आभार मानताना फातिमा म्हणाली की ती ज्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे तिथे अनेक भारतीय विद्यार्थी आहेत.

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

सर्व भारतीय घरी परतत असल्याची माहिती मिळताच तिने श्रीलंकेच्या दूतावासाशी संपर्क साधला आणि घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर, श्रीलंका आणि भारताच्या दूतावासांशी समन्वय साधून तिचा प्रवासाचे नियोजन केले.

फातिमा म्हणाली की, इराणमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि तिथे राहणे सुरक्षित नाही. लवकरच परिस्थिती सुधारेल आणि विद्यार्थी पुन्हा इराणला जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील अशी आशा आहे. बिहारमधील सिवान येथील सय्यद वाजी हैदर, जे प्रवाशांमध्ये होते, त्यांनी सांगितले की, भारतात परतल्यानंतर समाधान वाटत आहे.

श्रीलंकेच्या महिलेने भारत सरकारचे कौतुक केले

भारतीय दूतावास आणि भारत सरकारने केलेल्या व्यवस्थेचे तिने कौतुक केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमवारी संध्याकाळी ६.१५ वाजता नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या विशेष विमानाने २९० भारतीय नागरिक आणि एका श्रीलंकेच्या नागरिकाला बाहेर काढण्यात आले.

आतापर्यंत किती नागरिकांना परत आणले?

पहिले विमान शुक्रवारी रात्री उशिरा २९० भारतीयांसह नवी दिल्लीत उतरले आणि दुसरे विमान शनिवारी दुपारी ३१० भारतीयांसह उतरले. गुरुवारी येरेवनहून आणखी एक विमान आले. शनिवारी सकाळी अश्गाबातहून एक विशेष विमान नवी दिल्लीत पोहोचले. आतापर्यंत २००३ जणांना परत आणले आहे.

Web Title: Operation Sindhu accelerated, 290 Indians brought back from Iran; Sri Lankan woman included in the list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.