शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घुसखोरांना बाहेर काढण्याची हिंमत फक्त मोदी सरकारमध्येच - अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 04:53 IST

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी विद्यार्थी जो ‘आसाम करार’ केला, त्याचा आत्मा नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींनी १४ आॅगस्ट ८५ रोजी विद्यार्थी जो ‘आसाम करार’ केला, त्याचा आत्मा नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स द्वारे आसामातील नागरिक निश्चित करून, परदेशी घुसखोरा देशाबाहेर व मतदारयादीतून बाहेर काढणे होता. करार राजीव गांधींनी केला, मात्र व्होट बँकेसाठी बांग्लादेशींंना बाहेर काढण्याची हिंमत काँग्रेस सरकार दाखवू शकले नाही. ती हिंमत मोदी सरकारमध्ये आहे, असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी राज्यसभेत करताच, सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधक घोषणा देत सभापतींच्या आसनासमोर आले. सभापती नायडूंनी अगोदर दहा मिनिटे व नंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.आसाममधल्या ४0 लाख लोकांना भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सादर करता आलेला नाही. पण विरोधक मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करतात. माझा त्यांना सवाल आहे की आसामच्या मूळ नागरिकांना मानवाधिकाराचे हक्क नाहीत काय, असा सवाल अमित शहा यांनी केला. आसामचे अन्न पाणी, निवारा, नागरी सुविधा, स्थानिक लोकांचा रोजगाराचा हक्क या सर्वच गोष्टींवर घुसखोरांनी अतिक्रमण चालवले आहे.व्होटबँकेचे आरोपदिल्लीत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजपने हा खेळ चालवला आहे’, त्यावर अमित शहा म्हणाल की, व्होटबँकेचे राजकारण तर ममता बॅनर्जींनीच चालवले आहे. त्यांनी जनतेत संभ्रम निर्माण करू नये.जबाबदारी सरकारची : गुलाम नबीराज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की आपले नागरिक त्व सिध्द करण्याची सारी जबाबदारी ४0 लाख लोकांवर ढकलून चालणार नाही. उलट ते भारतीय नागरिक कसे नाहीत, हे सरकारने हे सिद्ध केले पाहिजे. विशिष्ट धर्माचे लोक आहेत म्हणून त्यांना देशाच्या बाहेर काढणे उचित नाही. अनेकांनी पुरावे दिले, तरीही त्यांची नावे नागरिकांच्या यादीत नाहीत.आसामातील लोकांमध्ये असुरक्षितताआसामममध्ये एनआरसी तयार करण्याचे काम चुकीच्या पद्धतीने केल्याने लाखो व्यक्तींची नावे वगळली जाऊन लोकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, ‘एनआरसी’चे संवेदनशील असे हे काम १,२०० कोटी रुपये खर्च करूनही नीटपणे केले गेले नसल्याचे स्पष्ट होते. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ‘संपुआ’ सरकारने जो आसाम करार केला त्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी हे ‘एनआरसी’चे काम होत आहे. पण ते अपेक्षेप्रमाणे न झाल्याने ही परिस्थिती उद््भवली आहे.या मुद्द्यावर सरकारने सर्वपक्षीय बैठकबोलवावी, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे.घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ जवान तैनातलोकसभेत गृहमंत्री राजनाथसिंग म्हणाले की, रोहिंग्या मुस्लीम मोठ्या संख्येने भारतात आले आहेत. त्यांची घुसखोरी थांबवण्यासाठी बीएसएफ व आसाम रायफल्सला तैनात केले आहे. तृणमूलचे सुगत बोस म्हणाले, भारतात ४0 हजारांहून अधिक रोहिंग्या वास्तव्याला आहेत. त्यांना परत पाठवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आॅपरेशन सुरू केले आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, रोहिंग्या मुस्लीम भारतात शरणार्थी नव्हेत, तर अवैध प्रवासी आहेत. रोहिंग्या मुस्लीम म्यानमारला परतले तर त्यांना सुविधा देण्यास भारत सरकार तयार आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहParliamentसंसद