शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

'ते देश तोडताहेत, काँग्रेसचा हातच हा देश जोडू शकतो': राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 11:02 AM

केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचं काम करतंय. पण काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे.

नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचं काम करतंय. पण काँग्रेसच्या 'हाता'त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे आणि ते काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय, अशी साद काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या महाअधिवेशनात घातली. 

देशातील तरुण आज हतबल दिसताहेत. ते मोदींकडे पाहतात, तेव्हा त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही. रोजगार कुठून मिळेल, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव कसा मिळेल, हे गंभीर प्रश्न आहेत. त्यातून काँग्रेस पक्षच दिशा दाखवू शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या महाअधिवेशनात भाषण केलं. ते काय बोलतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु, आपली सगळ्यांची मतं ऐकून समारोपाचं भाषण मी मोठं करेन, त्यात पक्षाची पुढची दिशा ठरवली जाईल, असं सांगून राहुल यांनी उद्घाटनाचं भाषण छोटेखानीच केलं.

राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्देः 

>> आज देशात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी लढवून देशाचं विभाजन केलं जातंय. अशावेळी आपलं काम देश जोडण्याचं आहे. 

>> हात हे काँग्रेसचं चिन्हं भारत जोडण्याचं काम करू शकतं, देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतं.

>> काँग्रेस पक्षाला आणि देशाला दिशा दाखवण्याचं काम आपल्याला एकत्र मिळून करायचं आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ आणि तरुण यांची फळी उभी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. 

>> देश हताश, हतबल झालाय. त्याला दिशाच सापडत नाहीए. ती दिशा आपण दाखवू. आजचे सत्ताधारी हे राग, तिरस्कार करताहेत. आपण प्रेमाने आणि बंधुभावाने देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम करू. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी