शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात- गृहमंत्री अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 02:02 IST

आमदार - पोलिसांत समन्वय साधणार; शांतता समित्यांची गरज

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.दिल्लीच्या ईशान्य भागात सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शहा यांच्या उपस्थितीत नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला, काँग्रेस नेते सुभाष चोप्रा, भाजपचे मनोज तिवारी, रामवीर बिदुडी, दिल्ली विधानसभेतील सर्व आमदार उपस्थित होते. पोलीस आणि आमदारांमध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे समजातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या शांतता समित्या स्थापन करण्याची गरज असल्याचेही शहा म्हणाले.हिंसाचार झालेल्या भागात पोलीस कर्मचाऱ्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमारेषांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंसाचार सुरू असताना अफवा रोखण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्लीकर आणि प्रसारमाध्यमांनी अफवा रोखण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.शांततेची सुनिश्चिती करा : अमित शहास्थानिक प्रतिनिधींनी तातडीने संवेदनशील भागांत बैठका घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे. नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.हिंसाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकी दाखवल्याने शहा यांनी हे सकारात्मक चित्र असल्याचे म्हटले आहे.सर्वपक्षीयांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत आणि हिंसाग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याची निश्चिती करावी, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहा