शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

दिल्लीत एक हजार सशस्त्र पोलीस तैनात- गृहमंत्री अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 02:02 IST

आमदार - पोलिसांत समन्वय साधणार; शांतता समित्यांची गरज

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हजार सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून, आंतरराज्य सीमारेषेवर लक्ष ठेवले जात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले.दिल्लीच्या ईशान्य भागात सोमवारी सुरू झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर शहा यांच्या उपस्थितीत नायब राज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांच्यात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला, काँग्रेस नेते सुभाष चोप्रा, भाजपचे मनोज तिवारी, रामवीर बिदुडी, दिल्ली विधानसभेतील सर्व आमदार उपस्थित होते. पोलीस आणि आमदारांमध्ये समन्वय साधून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे समजातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या शांतता समित्या स्थापन करण्याची गरज असल्याचेही शहा म्हणाले.हिंसाचार झालेल्या भागात पोलीस कर्मचाऱ्यासह ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांच्या सीमारेषांवर लक्ष ठेवले जात आहे. वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलिसांनी सर्वेतोपरी प्रयत्न केले. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हिंसाचार सुरू असताना अफवा रोखण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. दिल्लीकर आणि प्रसारमाध्यमांनी अफवा रोखण्यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे.शांततेची सुनिश्चिती करा : अमित शहास्थानिक प्रतिनिधींनी तातडीने संवेदनशील भागांत बैठका घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.सर्वांनी राजकारण बाजूला ठेऊन या परिस्थितीत एकत्र येण्याची गरज आहे. नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, असे आवाहनही शहा यांनी केले आहे.हिंसाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी एकी दाखवल्याने शहा यांनी हे सकारात्मक चित्र असल्याचे म्हटले आहे.सर्वपक्षीयांनी शांततेसाठी प्रयत्न करावेत आणि हिंसाग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात असल्याची निश्चिती करावी, असेही शहा म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहा