शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 7:46 PM

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

जम्मू:तालिबाननेअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून तेथील परिस्थिती बिकट होत चालली आहे. तालिबान सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असून, इराणच्या धर्तीवर सरकार बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. तालिबानच्या या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. भारत सरकार तालिबानशी आमने-सामने चर्चा करणार असल्याचे बोलले जात असून, एकूण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. (omar abdullah said modi govt should clear about whether taliban is terrorist group or not)

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्न सामान्यांना पडला असताना, यावर प्रतिक्रिया देताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, तालिबानचा जम्मू-काश्मीरवर काय परिणाम होईल, याबाबत केंद्रातील मोदी सरकारला विचारायला हवे. तसेच तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हेही मोदी सरकारने स्पष्ट करायला हवे, अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे.

PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

अनुच्छेद ३७०  पुन्हा लागू करण्यासाठी संघर्ष करणार

अलकायदाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देत ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्यापूर्वी राज्याचा दर्जा आणि अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याचा पुनरुच्चार करत, यासाठी संघर्ष करत राहणार असल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर निवडणुकांमध्ये ५० जागा मिळवण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे, यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये भाजपने ४४ जागा जिंकू असे म्हटले होते. ते पूर्ण झाले नाही. भाजपने आधी ४० जागा जिंकून दाखवाव्यात, असा टोला ओमर अब्दुल्ला यांनी लगावला आहे. 

घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP

बँक खाती उघडण्याची परवानगी द्यायला हवी

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे आधी स्पष्ट करायला हवे. तालिबान दहशतवादी संघटना असेल, तर आपण त्यांच्याशी चर्चा का करतोय आणि जर तालिबान दहशतवादी संघटना नाही, तर त्यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद्यांच्या यादीतून बाहेर ठेवायला हवे. त्यांना बँक खाती उघडण्याची अनुमती द्यायला हवी. आताच्या घडीला भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे भारताने यावर ठोस भूमिका घ्यायला हवी, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.   

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी