शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

विषारी दारूच्या बळींची संख्या ८५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 5:57 AM

१२ जणांना घेतले ताब्यात। आसाममध्ये ३०० हून अधिक जणांवर उपचार सुरू

जोरहाट : आसामच्या गोलाघाट आणि जोरहाटमध्ये चहाच्या बागांमधील कामगारांनी विषारी दारू प्यायल्यानंतर ३४० जणांवर उपचार सुरू आहेत. यातील मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी शनिवारी ही माहिती दिली.जोरहाट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचा दौरा केल्यानंतर मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मृत्यूचा आकडा दर मिनिटाला वाढत आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जेएमसीएचमध्ये ४६, गोलाघाटमध्ये ३५ आणि टिटाबोरमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. जेएमसीएचमध्ये २२१ जणांवर, गोलाघाटमध्ये १११ जणांवर उपचार सुरु आहेत.

मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, मी येथे आल्यानंतरही आणखी काही जणांना येथे दाखल करण्यात आले आहे.वैद्यकीय शिक्षणाचे संचालक अनुप बर्मन या रुग्णांवर देखरेख करणार आहेत. गोलघाट आणि जोरहाट जिल्ह्यात ५९ जणांचा मृत्यू झाला आहे. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी ही दारू प्यायली होती. काही वेळातच चार महिलांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कुलधर सैकिया यांनी सांगितले की, गोलाघाटमध्ये या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयेमुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जोरहाटच्या मेडिकल कॉलेज- हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या नागरिकांची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख तर आजारी पडलेल्या नागरिकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी सांगितले की, यातील दोषींना सोडणार नाही. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने असा आरोप केला आहे की, अवैध दारुची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. राज्याच्या अबकारी खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.