शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

धुक्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी 33000 अपघात तर 13000 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 13:14 IST

Road accidents:दरवर्षी सुमारे 4.5 लाख अपघात होतात, यात पाऊस आणि अपघातांमुळे होणाऱ्या अपघाचे प्रमाण 9 टक्के.

नवी दिल्ल: जसजसा हिवाळा ऋतू जवळ येत आहे तसतसे धुके पडू लागले आहे. धुक्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी दृश्यमानता कमी झाली आहे. या धुक्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात, यात अनेकांचा मृत्यू होतो, तर बरेचजण गंभीर जखमी होतात. ईस्टर्न पेरिफेरलवर शुक्रवारी सकाळी सुमारे डझनभर वाहनांची धडक झाली. धुक्यामुळे हा अपघात झाला. एका रिपोर्टनुसार, धुक्यांमुळे देशभरात दरवर्षी सुमारे 33,000 रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे 13,000 लोकांचा मृत्यू होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे 9 टक्के मृत्यू हे धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात होतात. ईस्टर्न पेरिफेरलमध्ये धुक्यामुळे शुक्रवारी सुमारे डझनभर वाहने आदळली. त्याचबरोबर द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, धुक्यात दृश्यमानता कमी झाल्यामुळे दरवर्षी रस्ते अपघात होतात. यामध्ये मृत्यूच्या तुलनेत जखमी झालेल्यांची संख्याही दुप्पट आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार एकूण रस्ते अपघातांपैकी 9 टक्के अपघात धुक्यामुळे होतात. जवळपास हाच आकडा पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातांचा आहे. धुक्यामुळे होणा-या रस्ते अपघातात मृतांची संख्या दुप्पट आहे. अहवालानुसार सुमारे 25000 लोक जखमी होतात. 

तज्ञ काय सांगतात ?सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सतीश पांडे सांगतात की, धुक्यात बहुतेक रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळे होतात. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहनांचा वेग ताशी 100 आणि 120 किमी असल्याने अचानक समोर आलेले धुके दिसत नाहीत. अनेकवेळा एखादे वाहन काही कारणास्तव धुक्यात आधीच पार्क केलेले असते, अशा परिस्थितीत पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला पार्क केलेले वाहन दिसत नाही आणि वाहने आदळतात. त्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील वाहनाचा वेग धुक्याच्या काळात 50-60 किमी ठेवावा, जेणेकरून वाहन नियंत्रणात राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेव्हा थांबवता येईल.

 

 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस