शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
2
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
3
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
4
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
5
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
6
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
7
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
8
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
9
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
10
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
11
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
12
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
13
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
14
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
15
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
16
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
17
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
18
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
19
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
20
अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

मशीद तोडणाऱ्यांना पुरस्कार, असदुद्दीन ओवेसींचा केंद्र सरकारवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 6:49 PM

केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे'हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो'महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे.

हैदराबाद : केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील आरोपी नृत्य गोपाल दास यांना अध्यक्ष आणि व्हीएचपीचे उपाध्यक्ष चंपत राय यांची महासचिव म्हणून निवड केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संताप व्यक्त केला आहे.  हा नवा भारत असून या ठिकाणी गुन्हेगारीचे काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातो, असे सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी यांदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना मशीद विध्वंस करण्याचे कृत्य लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. हा त्याचाच सिक्वल आहे. एक व्यक्ती जो बाबरी मशीद पाडण्याचा आरोपी आहे, त्याच्याकडे सरकारने राम मंदिर उभारणीची जबाबदारी सोपविली आहे. हा नवा भारत आहे, याठिकाणी गुन्हेगारीला पुरस्कार दिला जातो." 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या काल झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर चंपत राय यांना या ट्रस्टचे सरचिटणीस बनविण्यात आले. महंत नृत्य गोपाल दास 1984 पासून राम मंदिर आंदोलनाशी निगडीत आहेत. त्यांच्याच अध्यक्षतेखाली मंदिर कार्यशाळेत राम मंदिरासाठी दगड शोधण्याचे काम सुरू होते. बाबरी विध्वंसानंतर सीबीआय कोर्टात दास आणि राय यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे.

दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कामाला आता सुरुवात झाली असून, पुढील 15 दिवसांत प्रत्यक्ष मंदिर बांधकाम कधी सुरू करायचे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी लवकरच अयोध्येत जाणार असून, तेथील संत-महन्तांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष भूमिपूजनाची तारीख ठरविण्यात येईल. ट्रस्टच्या कालच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रामनवमी 2 एप्रिल रोजी आहे. त्यादिवशी मंदिर उभारणीचे काम सुरू करावे, असाच ट्रस्टचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत सर्व औपचारिक बाबी पूर्ण झाल्या, तरच कामास प्रारंभ करता येणार आहे.

2024पर्यंत मंदिर पूर्ण?या मंदिराचे काम कधीही सुरू झाले तरी ते 2024 पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण व्हावे, असा ट्रस्ट प्रयत्न करेल. किंबहुना ते मंदिर तोपर्यंत बांधून पूर्ण करायचे, असेच ठरविण्यात आले आहे. लोकसभेच्या पुढील निवडणुका 2024मध्ये होतील. त्याआधी मंदिर झाले, तर त्याचा फायदा भाजपला मिळेल, असे त्या पक्षाच्या तसेच संघ परिवारातील मंडळींचे म्हणणे आहे. आम्ही आमची घोषणा पूर्ण केली, असे सरकारही तेव्हा सांगू शकेल. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या