शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Teacher Job: आता एकदाच द्यावी लागणार टीईटी परिक्षा; मोदी सरकारचे शिक्षकांना दिवाळी गिफ्ट

By हेमंत बावकर | Published: October 21, 2020 2:10 PM

TET Exam for Teacher Job: सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते.

ठळक मुद्देअनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

सरकारी नोकरी ती देखील शिक्षकाची, हे अनेकांचे स्वप्न असते. यासाठी बीएड, डीएड केले जाते. मात्र, वशिलेबाजीमुळे गरजवंत किंवा हुशार उमेदवार मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो. ही पद्धत थांबविण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही परिक्षा शिक्षक झालेल्यांसाठी सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती. यावर केंद्र सरकारने आता मोठा दिलासा दिला आहे. 

सुरुवातीच्या काळात शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच दरवर्षी टीईटी परिक्षा घेतली जात होती. एकदा का ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. मात्र, आता केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. एकदा का टीईटी परिक्षा उत्तीर्ण झाली की त्या उमेदवाराला आयुष्यात कधीही पुन्हा टीईटी परिक्षा द्यावी लागणार नाही. 

अनेक राज्यांमध्ये वशिलेबाजीने नोकरी लागल्याने शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. बऱ्याच शिक्षकांना साधे पाढे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते. तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आले होते. यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती. उत्तर प्रदेश, बिहारमध्येतर शिक्षक भरतीचे मोठमोठे घोटाळे उघड झाले आहेत. 

टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे प्रतिभावान उमेदवारांना सोपे झाले आहे. यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने टीईटी परिक्षा आयुष्यभरासाठी मान्य केली आहे. यामुळे सात वर्षे नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परिक्षा देण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही. 

नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नियम केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही लागू होणार आहेत. दोन्ही सरकारांच्या परिक्षा या एनसीटीई नियमांवरच होतात. केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वत:च परिक्षा आयोजित करतात. या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.  

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरतीexamपरीक्षाCentral Governmentकेंद्र सरकार