शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
4
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
5
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
6
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
7
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
8
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
9
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
10
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
11
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
12
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
13
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
14
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
15
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
16
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
17
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
18
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
19
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
20
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...

'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बिहारमध्येही बंदी, भन्साळींनी तक्रारींचं समाधान करावं - नितीश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 8:48 AM

संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व वादग्रस्त 'पद्मावती' सिनेमा बिहारमध्येही प्रदर्शित केला जाणार नाहीय

पाटणा - संजय लीला भन्साळी यांचा बहुचर्चित व वादग्रस्त 'पद्मावती' सिनेमा बिहारमध्येही प्रदर्शित केला जाणार नाहीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सिनेमासंदर्भात सांगताना स्पष्ट केले आहे की,'संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती सिनेमा तोपर्यंत रिलीज होणार नाही, जोपर्यंत भन्साळी सर्व राजकीय पक्षांचं समाधान करत नाहीत'

खरंतर भाजपाचे आमदार नीरज कुमार बबलू यांनी नितीश कुमार यांची भेट घेऊन पद्मावती सिनेमाच्या रिलीजवर बंदी आणण्याची मागणी केली होती. मंगळवारी (28 नोव्हेंबर) सकाळी विधानसभा परिसरातही नीरज यांनी पद्मावती सिनेमाला विरोध दर्शवत समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्याविरोधातही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.  

दरम्यान, नितीश कुमार यांची भूमिका निश्चित स्वरुपात आश्चर्य चकीत करणार आहे. मात्र पद्मावतीच्या वादात त्यांना अडकायचे नसल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच नितीश कुमार यांनी सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सर्व राजकीय पक्षांनी ज्या-ज्या शंका, तक्रारी उपस्थित केल्या आहेत, त्यांचे समाधान करण्यास सांगितले आहे.  पुढे ते असेही म्हणालेत की, जेव्हा सर्व जण भन्साळी यांच्या स्पष्टीकरणामुळे समाधानी होतील, तेव्हा पद्मावती सिनेमा बिहारमध्ये रिलीज करण्यास कोणताही आक्षेप नसेल.  

'पद्मावती'वरुन वादग्रस्त वक्तव्य करणा-या मंत्री- मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं  दरम्यान, पद्मावती सिनेमावरुन वादग्रस्त वक्तव्य करणा-या उच्च पदावरील अधिकारी, मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (28 नोव्हेंबर )चांगलंच फटकारलं. सेन्सॉर बोर्ड जोपर्यंत सिनेमाला हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत वादग्रस्त वक्तव्यं करणं टाळलं पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' सिनेमा भारताबाहेर प्रदर्शित करण्यावर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. सिनेमासंबंधी सेन्सॉर बोर्ड अंतिम निर्णय घेईल, असं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. न्यायालयाने सांगितलं की, 'जेथे सिनेमावरुन अद्याप सेन्सॉर बोर्डाने अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही आणि प्रकरण अद्याप सेन्सॉर बोर्डाकडेच आहे, तिथे उच्च पदावरील व्यक्ती सिनेमाला प्रमाणपत्र दिलं गेलं नाही पाहिजेअसं कसं म्हणू शकतात', अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त वक्तव्यांची दखल घेत हे म्हणजे सिनेमा पाहण्याआधीच तयार केलेलं मत आहे, अशी टिप्पणी केली. सेन्सॉर बोर्डाने अद्याप सिनेमाला प्रमाणपत्र दिलं नसताना अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्य करणं कायद्याविरोधात आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. याचिकेत प्रतिष्ठित इतिहासकारांची एक समिती तयार करण्याची विनंती करण्यात आली होती. ही समिती पद्मावती सिनेमामध्ये काही चुकीच्या गोष्टी नाहीयेत का?, याची पाहणी करणार. 

मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, ए एम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. महत्त्वाच्या जागांवर विराजमान व्यक्तींनी बेजबाबदार वक्तव्यं करणं चुकीचं असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे. संजय लीला भन्साळी यांनीदेखील जोपर्यंत सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत सिनेमा इतर देशांमध्येही रिलीज करणार नाही असं स्पष्ट केलं आहे. चित्रपट 1 डिसेंबरला भारताबाहेर रिलीज होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :Padmavatiपद्मावतीDeepika Padukoneदीपिका पादुकोणShahid Kapoorशाहिद कपूरRanveer Singhरणवीर सिंगSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी