शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 9:43 AM

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अमेठी हे फार पूर्वीपासून गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे; परंतु २५ वर्षांत पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील सदस्य लोकसभेच्या या जागेवरून निवडणूक लढवणार नाही. यंदा काँग्रेसने निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी दिली आहे.

गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. १९६७ मध्ये मतदारसंघ झाल्यापासून अमेठी गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. तेव्हापासून सुमारे ३१ वर्षे गांधी कुटुंबातील सदस्याने अमेठीचे प्रतिनिधित्व केले आहे. १९७७मध्ये जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंह यांनी संजय गांधी यांना पराभूत केले हाेते. त्यानंतर संजय गांधी यांनी १९८०मध्ये पुन्हा येथून विजय मिळविला.   त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर १९८१मध्ये झालेल्या पाेटनिवडणुकीत राजीव गांधी विजयी झाले हाेते. त्यांच्या हत्येनंतर झालेल्या पाेटनिवडणुकीत सतीश शर्मा विजयी झाले हाेते. २०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा ५५,००० हून अधिक मतांनी पराभव केल्याने काँग्रेसचा बालेकिल्ला भंग झाला होता.

आदेशाचे पालन करणार

मी कायम गांधी कुटुंबाचा सेवक राहिलाे आहे. गांधी कुटुंबाने एका सेवकाला जबाबदारी साेपविली आहे. ती मी पार पाडणार. गांधी कुटुंबानेच अमेठीतून लढावे, हीच माझी इच्छा हाेती. मात्र, त्यांनी आदेश दिला आणि सेवक म्हणून ताे स्वीकार करुन निवडणूक लढविणे, हा माझा धर्म आहे.

- किशाेरी लाल शर्मा, उमेदवार, काॅंग्रेस.

त्यांनी पराभव स्वीकारला

अमेठीतील निवडणूक रिंगणात गांधी कुटुंबाची अनुपस्थिती हे सूचित करते की, काँग्रेसने मतदानापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. जर त्यांना या जागेवर विजयाची काही शक्यता वाटली असती, तर त्यांनी येथून निवडणूक लढवली असती आणि त्यांच्या वतीने उमेदवार उभे केले नसते.

-स्मृती इराणी, उमेदवार, भाजप.

यापूर्वी बिगर गांधी घरण्याच्या उमेदवार झाला होता पराभूत

nशेवटच्या वेळी १९९८ मध्ये या मतदारसंघातून बिगर-गांधी उमेदवार रिंगणात होते.

nतेव्हा राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचे जवळचे सहकारी सतीश शर्मा यांनी निवडणूक लढवली होती; परंतु भाजपच्या संजय सिंह यांनी त्यांचा पराभव केला होता.

nसोनिया गांधी यांनी १९९९ मध्ये सिंह यांचा ३ लाखांहून अधिक मतांनी पराभव करून ही जागा पुन्हा जिंकली होती.

n२००४ मध्ये राहुल गांधी यांना अमेठीतून उमेदवारी देण्यासाठी सोनिया गांधी लगतच्या रायबरेली मतदारसंघात गेल्या. राहुल यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये सलग तीन वेळा मतदारसंघातून विजय मिळविला.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४