शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

Mohan Bhagvat: आता पुढचा नंबर स्वामी विवेकानंदांचा; सावरकरांवरील टीकेवरून मोहन भागवतांचा 'इशारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 9:37 PM

Mohan Bhagwat On Veer Savarkar: एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते, असे मोहन भागवत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सावरकरांना बदनाम करण्याची मोहिम सुरु आहे. आजच्या काळात वीर सावरकर यांच्या बाबतच्या खऱ्या माहितीचा अभाव जाणवत असल्याचे भागवत म्हणाले. 

भागवत म्हणाले, आरएसएस आणि सावरकरांवर टीका-टिप्पणी केली जातेय. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांचा नंबर येईल. भारताला जोडण्यामुळे ज्याचे दुकान बंद होईल त्याला ते चांगले वाटणार नाही. असे जोडण्याच्या विचाराला धर्म म्हटले जाते. मात्र, हे धर्म जोडण्याचे आहे ना ही पूजा पद्धतीच्या आधारावर विभाजन करणारे. यालाच मानवता किंवा संपूर्ण जगाची एकता म्हटले जाते. वीर सावरकरांनी यालाच हिंदुत्व म्हटले आहे, असे भागवत म्हणाले. 

एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची  गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते. सावरकरांचे हिंदूत्व, विवेकानंदांचे हिंदूत्व हे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. हिंदूत्व एकच आहे, जे आधीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील, असे देखील भागवतांनी सांगितले. 

सैयद अहमद यांना मुस्लिम असंतोषाचे जनक म्हटले जाते. इतिहासात दारा शिकोह, अकबर झाले, पण औरंगजेब देखील होताच, ज्याने चाक उलट दिशेने फिरविले. अशफाक उल्लाह खान यांनी म्हटले होते, मेल्यानंतर जो पुढला जन्म मिळेल तो भारतात घेईन. अशा लोकांची नावे पुढे आली पाहिजेत, असेही भागवत यांनी सांगितले.

सावरकरांचे युग येतेय...संसदेच आज काय होत नाहीय, फक्त मारहाण होत नाहीय बाकी सारे होते. बाहेर येतात एकत्र चहा पितात, एकमेकांकडे लग्नांना जातात. इथे सर्व समान आहे, यामुळे विशेषाधिकाराची भाषा कोणी करू नये. सुरक्षा नीति चालेल, सुरक्षेची चर्चा होईल पण राष्ट्रनीतिच्या मागे. काही लोकांनुसार 2014 नंतर सावरकर युग येत आहे, हे बरोबर आहे. सर्वाची जबाबदारी आणि भागीदारी असेल, हेच हिंदुत्व आहे, असेही भागवत म्हणाले. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत