शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:15 IST

India China Faceoff: जर चीनने भारतावर हल्ला केला तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानकडूनही घेतला जाण्याची शक्यता रावत यांनी वर्तविली आहे.

नवी दिल्ली : लडाखमध्ये चीन युद्ध करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. यामुळे भारताने अरुणाचलप्रदेशसह एलएसीवरील भागात सैन्य कुमक वाढविण्यास सुरुवात केली असून सीडीएस जनरल बिपीन रावत यांनी मोठा इशारा दिला आहे. 

जर चीनने भारतावर हल्ला केला तर त्याचा गैरफायदा पाकिस्तानकडूनही घेतला जाण्याची शक्यता रावत यांनी वर्तविली आहे. (Threat of China-Pak calibrated action against India) यासाठी भारतीय सैन्याला तयार रहावे लागणार आहे. चीन आणि पाकिस्तानमधील पीओके क्षेत्रातील सहकार्याच्या घडामोडींवर आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. दोन्ही बाजुंनी हल्ला होण्याची शक्यता असून चीनच्या काही आक्रमक हालचाली जाणवू लागल्याचे रावत यांनी सांगितले. 

भारत आणि अमेरिकेमधील तिसरी रणनीती सहकार्य फोरमध्ये बोलताना त्यांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानने आपल्याविरोधात एकप्रकारचे युद्धच छेडले आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसविण्यासह भारताच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद पसरविण्याचे काम करत आहे. आता पाकिस्तान उत्तरेकडील सीमेवरही संकटे आणू पाहत आहे. असे केल्यास त्याचे मोठे नुकसान पाकिस्तानला झेलावे लागणार आहे, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला. 

भारताला पूर्व आणि पश्चिमेकडून दोन्ही बाजुने एकाचवेळी हल्ला होण्याचा धोका सांगताना रावत यांनी यावर तयारी करण्याचा विचार सुरु असल्याचे म्हटले आहे. भारतीय सैन्य दले या दोन्ही संकटांना तोंड देण्यासाठी तयार राहणार आहेत. भविष्यासाठी ही तयारी करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.

आम्हाला एलएसीवर शांतता हवी आहे. मात्र, चीन आक्रमक पद्धतीने हालचाली करत असून आम्हीही त्याला चोख प्रत्यूत्तर देण्याची ताकद ठेवून आहोत. अमेरिकेने भारताला अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक सारखे हेलिकॉप्टर दिले आहेत. हे सैन्य सामुग्री सहकार्य पुढेही सुरुच राहिल असे रावत म्हणाले. 

 

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावPakistanपाकिस्तानBipin Rawatबिपीन रावतwarयुद्ध