शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दवाखान्यातील प्रत्येक मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे नसतो - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 05:59 IST

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : वैद्यकीय सेवेचे योग्य ज्ञान नसल्यामुळे, काल्पनिक गृहितकावर हॉस्पिटलमधील प्रत्येक मृत्यूला वैद्यकीय निष्काळजीपणा जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवत राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने दिलेला आदेश कायम ठेवला आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा आरोप करत दिल्लीतील एका मृताच्या पत्नीने राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यात नुकसानभरपाई म्हणून ७ कोटी आणि मानसिक त्रासासाठी ३ कोटी रुपये मागण्यात आले होते. तिचा आरोप होता की, तिने पतीला उलट्या होत असल्यामुळे रुग्णालयात आणले. कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये तपासणी केल्यानंतर त्याला पुन्हा उलट्या झाल्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. यानंतर रुग्णाच्या अंगावर पेटके उठले (गोळे आले) आणि तो बेशुद्ध पडला. घरच्या लोकांना कॅज्युअल्टी वॉर्डमधून अत्यंत वाईट वागणूक देत बाहेर काढण्यात आले. नंतर रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ७० टक्के ब्लॉकेज असल्याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करूनही हृदयरोगतज्ज्ञांना बोलाविण्यात आले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णाला आयसीयूमध्ये हलविण्यात आले आणि त्यानंतर १ वाजता मृत घोषित करण्यात आले.

डाॅक्टरांनी यावर आपली बाजू मांडताना रुग्ण मधुमेही असल्याची वस्तुस्थिती रुग्ण आणि त्यांच्या पत्नीने लपविल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञ आणि क्रिटिकल केअर टीमने रुग्णावर योग्य उपचार केले, परंतु रुग्णाला वाचविता आले नाही. रुग्णाला मळमळ आणि ॲसिडिटीसाठी इंजेक्शन देण्यात आले होते आणि ईसीजी चाचणी करण्यात आली होती. ईसीजीमध्ये सूक्ष्म बदल दिसून आले. ड्युटीवरील निवासी हृदयरोगतज्ज्ञाने हे पाहिले व तात्काळ जेष्ठ डॉक्टरांना तातडीने कळविण्यात आले. नंतर रुग्णाला श्वासोच्छवासाचा तीव्र त्रास झाला आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डाॅक्टरांनी सर्व प्रयत्न केले, परंतु ते अयशस्वी झाले आणि रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. राष्ट्रीय ग्राहक आयोगाने  दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ही याचिका फेटाळली. याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे आदेश कायम ठेवत अपील फेटाळले.

कोणत्या प्रकारची योग्य वैद्यकीय काळजी घेतली नाही, हे सूचित करणारा कोणताही विशिष्ट पुरावा जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत न्यायालयाला डॉक्टरांच्या वैद्यकीय निर्णयावर आक्षेप घेणे शक्य होणार नाही. पुरेसे वैद्यकीय ज्ञान नसताना, काल्पनिक गृहितकावर, रुग्णालयातील प्रत्येक मृत्यूला तो वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला, असे म्हणता येणार नाही. - न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, ए. एस. बोपण्णा आणि जे. बी. परडीवाला

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयdoctorडॉक्टर